AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा, महायुतीत खळबळ, शिंदेंचे..

कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी जिल्हा परिषद शाळांकडे आपला मोर्चा वळवला आहे. यादरम्यान अत्यंत मोठे विधान अभिजीत दिपके यांनी केले. ज्यामुळे आता शिंदे गटाचे टेन्शन वाढले.

अभिजीत दिपके यांनी थेट मागितला महाराष्ट्रातील या मंत्र्याचा राजीनामा, महायुतीत खळबळ, शिंदेंचे..
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 20, 2026 | 12:33 PM
Share

अभिजीत दिपके यांनी अमेरिकेतून भारतात दाखल होत मोठे आंदोलन उभारले. नीट पेपरफुटीविरोधात त्यांनी हे आंदोलन सुरू केले. या आंदोलनाला मोठा प्रतिसाद देशभरातून मिळाला. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अखेर नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला. हा मोदी सरकारसाठी मोठा झटका होता.  यादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या बैठकीत अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले की, त्यांचा सध्याच राजकारणात जाण्याचा विचार नाही. पण विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर ते आपला लढा सुरू ठेवतील. अभिजित दिपके यांनी आपला मोर्चा जिल्हा परिषद शाळांकडे वळवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शाळेला त्यांनी भेट दिली. मुख्याधापकांच्या बदलीसाठी त्यांनी आग्रह धरला. जर मुख्याध्यापकांची बदली झाली नाही तर उपोषणाला बसणार असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

आता नुकताच अभिजीत दिपके यांनी म्हटले की, जेवढे मंत्री आहेत, आमदार ,खासदार आहेत त्यांनी आपल्या मुलांना एक दिवस खराब रस्त्यावरून पायी शाळेत पाठवले पाहिजे. तेव्हा कुठे त्यांच्या लक्षात विद्यार्थ्यांच्या समस्या येतील.  आता आम्ही येतोय म्हटल्यावर हे सगळे कामाला लागले, काही आदिवासी मुले मृत्यू पावली.

फक्त रस्ते खराब होते म्हणून, साप चावून मुले गेली.. सरकारच्या अपयशामुळे ही मुले मृत्यू पावली. उजनीच्या या शाळेत देखील साप निघाले आहेत, क्लास रूममधे देखील साप निघत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावले तर या प्रश्नावर भेटू.. गावकऱ्यांनासोबत घेऊन आवाज उठवू आणि तो आवाज मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचेल.

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो नव्हतो.. भेटण्याची गरज नाही, जे काम व्हायचे होते ते झाले. गावकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांसारखे इथे शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत, आता ते म्हणतील मागच्या सरकारचे दोष आहे, आम्ही आता निवडून आलो. मात्र, परिस्थिती बदलली नाही. शाळेवर आणखीनही पत्रे आहेत.

मुलांना बसायला बेंच नाहीत. मग तुम्ही दहा वर्षात केले काय? शाळेची अवस्था पाहून मला वाटते की त्यांनी पदावर राहू नये ,राजीनामा दिला पाहिजे. शिक्षण मंत्री कोणीही असो त्यांची मुले सरकारी शाळेत पाठवावीत. त्यांना शिक्षण मंत्री पदावर राहायचे असेल तर मुले सरकारी शाळेत पाठवली पाहिजेत. शाळांची हीच परिस्थिती राहिली तर गावागावात आंदोलने उभी राहतील.

नीट पेपर लीक प्रकरणात बोलताना अभिजीत दिपके यांनी म्हटले की, सीबीआयचा जो तपास सुरू आहे ,त्यावर मी समाधानी नाही.. सीबीआय मोठ्या लोकांना वाचविण्याचा प्रयत्न करते आहे खालचे चार पाच लोक पकडायचे आणि कार्यवाही केली असे दाखवायचे असं सुरू आहे. मोठे अधिकाऱ्यांच्या सहभाग शिवाय नीट पेपर लीक होऊ शकते असे मला वाटत नाही…

Follow Us
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं विधान
धाकधुक वाढली! शिवसेनेचं चिन्ह गोठणार की... वकील अनंत कळसेंचं सुचक वक्तव्य, अखेर मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठ विधान
मोठी बातमी! लाडकी बहिण योजनेतील अपात्रतेबाबत मुख्यमंत्री फडणीसांचं मोठं विधान; काय म्हणाले?
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल,
जुन्नरच्या अत्याचार प्रकरणावरून राऊतांचा फडणवीस, शिंदेंवर हल्लाबोल, अमृता फडणवीसांनाही म्हणाले...
उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे...
Pocket Money Scheme : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार? अमित ठाकरे म्हणाले..
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत डॉ. सूरदास यांनी काय काय सांगितलं?
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा