Nashik Accident:अपघातांची मालिका थांबणार कधी? नाशिक-सिन्नर महामार्ग ठरतो आहे का मृत्यूचा सापळा?

शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत. यानंतर तरी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या.

Nashik Accident:अपघातांची मालिका थांबणार कधी? नाशिक-सिन्नर महामार्ग ठरतो आहे का मृत्यूचा सापळा?
nashik shirdi highway accidentImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 2:21 PM

नाशिक : नाशिक-सिन्नर महामार्गावर (Nashik Bus accident)गेल्या काही महिन्यांपासून अपघाताचे सत्र होत आहे. त्यात पुन्हा एका अपघाताची भर शुक्रवारी पडली. गेली अनेक महिने अपघात होत आहे. परंतु हे अपघात रोखण्यासाठी काय गेले आहे? हा प्रश्न जनतेच्या मनात आहे. शुक्रवारी सिन्नर -शिर्डी महामार्गावर खासगी आराम बस व ट्रक यांच्या समोरासमोर धडक झाली. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात सहा महिलांचा समावेश आहेत. यानंतर तरी अपघात रोखण्यासाठी काही उपाययोजना करायला हव्या.

यापुर्वी कधी झाले अपघात

  • ८ डिसेंबर रोजी महामार्गावरील पळसे येथे महामंडळाच्या दोन बसेस पेटल्या. तीन मोटारसायकल आणि मोटार यांच्या अपघातात एक बस पेटली. या विचित्र अपघातात बसमधील चार जणांचा मृत्यू झाला होता.
  • ९ डिसेंबर रोजी मोहदरी घाटात अपघात होऊन पाच तरुणांचा मृत्यू झाला.सिन्नरजवळील मोहदरी घाटात तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ५ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर चार जण जखमी झाले होते.
  • ८ ऑक्टोंबर रोजी नाशिकमध्ये खासगी बसचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात बसला आग लागली. या आगीत १२ प्रवाशी जिवंत होरपळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
  • २ नोव्हेंबर रोजी पुणे नाशिक मार्गावर सिन्नर जवळ पुन्हा एक शिवशाही बस आगीत भस्मसात झाली. या घटनेतही प्रवाशी हे थोडक्यात बचावले होते.
  • गेल्या तीन चार महिन्यात छोटे-मोठे अनेक अपघातही झाले आहेत.
  • का होतात अपघात राज्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यात सरकारी यंत्रणा अपयशी ठरत आहे. नेमकी कारणं काय? पाहू या…
  • वाहन चालवताना चालकांचे वेगावर नियंत्रण नसणे
  • मद्य पिऊन वाहन चालवणे, अधिक वेळ वाहन चालवणे
  • धोकेदायक पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेन कटिंग करणे
  • क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवणे
  • गाडी चालवताना मोबाईलवर बोलणे
  • इतर वाहतूक नियमांचे पालन न करणे

लोकांनी आणि सरकारी यंत्रणे ठरवल्यास या कारणांमुळे होणारे अपघात सहज टाळता येईल. यासंदर्भात साम, दाम, दंड, भेद अशा उपाययोजना करायला हव्या. त्यानंतर अपघाताचे प्रमाण कमी होईल. परंतु सरकारी यंत्रणा आपल्या पारंपारीक कामकाज पद्धतीनेच चालतात. वाहन चालवण्याच्या नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघड्या डोळ्यांनी पाहतात. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.

Non Stop LIVE Update
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.