AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

'सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता', दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
| Updated on: Jan 24, 2025 | 6:32 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता , दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या 54 कंपन्यांपैकी फक्त 11 कंपन्या या बाहेरच्या आहेत. 43 कंपन्या या भारतीय आहेत, 43 पैकी 33 कंपन्या तर महाराष्ट्रातीलच आहेत. डावोसमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येतात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. एमएमआरडीए आणि सिडकोनं 4 लाख करार केलेले होते.  नगरविकास मंत्री शिंदे गावाला आणि फडणवीस डावोसाला होते. शिंदेंवर अन्याय झालेला आहे, त्यांची नाराजी पाहायला मिळते. काही एमओयू बिल्डरसोबत केलेले आहेत. नगरविकास खातं डावोसला पण मंत्री गावाला होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उदय सामंतांच्या दाव्यानं चर्चेला उधाण 

दरम्यान शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच फुटणार होती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या या दाव्याला शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर दावोसमधून उदय सामंत यांनी देखील असाच दावा केला. शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असून, पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.