AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

'सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता', दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
| Updated on: Jan 24, 2025 | 6:32 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता , दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या 54 कंपन्यांपैकी फक्त 11 कंपन्या या बाहेरच्या आहेत. 43 कंपन्या या भारतीय आहेत, 43 पैकी 33 कंपन्या तर महाराष्ट्रातीलच आहेत. डावोसमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येतात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. एमएमआरडीए आणि सिडकोनं 4 लाख करार केलेले होते.  नगरविकास मंत्री शिंदे गावाला आणि फडणवीस डावोसाला होते. शिंदेंवर अन्याय झालेला आहे, त्यांची नाराजी पाहायला मिळते. काही एमओयू बिल्डरसोबत केलेले आहेत. नगरविकास खातं डावोसला पण मंत्री गावाला होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उदय सामंतांच्या दाव्यानं चर्चेला उधाण 

दरम्यान शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच फुटणार होती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या या दाव्याला शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर दावोसमधून उदय सामंत यांनी देखील असाच दावा केला. शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असून, पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर