AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

'सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता', दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
| Updated on: Jan 24, 2025 | 6:32 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता , दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या 54 कंपन्यांपैकी फक्त 11 कंपन्या या बाहेरच्या आहेत. 43 कंपन्या या भारतीय आहेत, 43 पैकी 33 कंपन्या तर महाराष्ट्रातीलच आहेत. डावोसमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येतात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. एमएमआरडीए आणि सिडकोनं 4 लाख करार केलेले होते.  नगरविकास मंत्री शिंदे गावाला आणि फडणवीस डावोसाला होते. शिंदेंवर अन्याय झालेला आहे, त्यांची नाराजी पाहायला मिळते. काही एमओयू बिल्डरसोबत केलेले आहेत. नगरविकास खातं डावोसला पण मंत्री गावाला होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उदय सामंतांच्या दाव्यानं चर्चेला उधाण 

दरम्यान शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच फुटणार होती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या या दाव्याला शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर दावोसमधून उदय सामंत यांनी देखील असाच दावा केला. शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असून, पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच...
शिरसाटांचा मोठा दावा- निदा खानला कोणी लपवलं? थेट त्या नेत्याचं नावच....