‘सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता’, दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.

'सह्याद्रीवरच कार्यक्रम व्हायला हवा होता', दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला
Follow us
| Updated on: Jan 24, 2025 | 6:32 PM

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दैऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता असा टोला आदित्य ठाकरे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यावरून आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. ‘दावोस दौऱ्याचा 20 ते 25 कोटी खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता , दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या 54 कंपन्यांपैकी फक्त 11 कंपन्या या बाहेरच्या आहेत. 43 कंपन्या या भारतीय आहेत, 43 पैकी 33 कंपन्या तर महाराष्ट्रातीलच आहेत. डावोसमध्ये वेगवेगळ्या देशातून लोक येतात, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील टीका केली. एमएमआरडीए आणि सिडकोनं 4 लाख करार केलेले होते.  नगरविकास मंत्री शिंदे गावाला आणि फडणवीस डावोसाला होते. शिंदेंवर अन्याय झालेला आहे, त्यांची नाराजी पाहायला मिळते. काही एमओयू बिल्डरसोबत केलेले आहेत. नगरविकास खातं डावोसला पण मंत्री गावाला होते, असा टोला आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

उदय सामंतांच्या दाव्यानं चर्चेला उधाण 

दरम्यान शिवसेना देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीपूर्वीच फुटणार होती असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांच्या या दाव्याला शिवसेनेकडून देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला होता. त्यानंतर दावोसमधून उदय सामंत यांनी देखील असाच दावा केला. शिवसेनेचे काही आमदार आमच्या संपर्कात असून, पुढील दोन ते तीन महिन्यांमध्ये मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले
जोपर्यंत अमित शाह तोपर्यंत शिंदे गट - संजय राऊत भडकले.
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर
दिल्लीत कोणाची सत्ता येणार ? आजी-माजी मुख्यमंत्री पिछाडीवर.
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर
दिल्लीत कांटे की टक्कर, आपचे तीन मोठे चेहरे पिछाडीवर.
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?
बीडचे SP कॉवत ॲक्शन मोडवर, पोलीस अधीक्षकांची 80 जणांना तंबी, कारण काय?.
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा
तब्बल 'इतक्या' लाख लाडक्या बहिणी अपात्र, आदिती तटकरेंनी थेट दिला आकडा.
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने...
कोर्टाचा निर्णय येताच दमानियांची मोठी मागणी, करूणा शर्मांना तातडीने....
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज
लोकलमधून उतरताना ओढणी दुसऱ्याच्या बॅगेत अडकली अन्..., बघा CCTV फुटेज.
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका
'त्या काय मला न्याय देणार?' शर्मांची महिला आयोगाच्या अध्यक्षांवर टीका.
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल
'हा निवडणूक आयोगाचा खेळ... इतके मतदार कसे वाढले?', राहुल गांधींचा सवाल.
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे
'बिबट्या माणसाला मारतो, आम्हालाही बिबट्याला मारू द्या'- सुजय विखे.