AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Accident | धावत्या रेल्वेस आग, प्रवाशांनी मारल्या उड्या

Railway Accident | अहमदनगर सोलापूरच्या ट्रॅकवर धावत्या रेल्वेला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. परंतु रेल्वेला आग लागल्यानंतर प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या.

Railway Accident | धावत्या रेल्वेस आग, प्रवाशांनी मारल्या उड्या
| Updated on: Oct 17, 2023 | 9:12 AM
Share

अहमदनगर | 17 ऑक्टोंबर 2023 : अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावर एका पॅसेंजर ट्रेनला सोमवारी अचानक आग लागली. ही रेल्वे अहमदनगरहून आष्टीकडे निघाली होती. त्यावेळी या पॅसेंजर ट्रेनला अहमदनगर सोलापूर ट्रॅकवर वाळूंजजवळ आग लागली. रेल्वेच्या पहिल्या दोन बोगींना ही आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्यात काही जणांना किरकोळ जखमी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुर्घटना घडली नाही.

प्रवाशांना मारल्या उड्या

अहमदनगर आणि आष्टी दरम्यान इंजिनानंतरच्या दोन डब्यांना आग लागली. आग लागल्याची घटना घडली तेव्हा गाडीत जास्त प्रवाशी नव्हते. ही आग इतकी भीषण होती की त्यात 2 बोगी जळून खाक झाल्या. ही रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातच धावत होती. गाडीत केवळ पाच प्रवासी उपस्थित होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी धावत्या रेल्वेतून बोगीतून उड्या मारल्या. त्यात ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्नीशमन दलाचे बंब पोहचले

आगीच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे 1 लाख लिटर पाण्याचा मारा करून 2 बोगींवरील आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली त्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप देण्यात आली नाही. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

गर्दी नसल्यामुळे टळली मोठी घटना

अहमदनगर आणि आष्टी दरम्यान वाळूंजजवळ रेल्वेच्या डब्याला आग लागली तेव्हा या गाडीत गर्दी नव्हती. गाडीत गर्दी असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अहमदनगर आष्टी दरम्यान या रेल्वे सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेची रेल्वे विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Follow Us
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका
युद्धजन्य परिस्थितीचा नाशिकच्या कांदा उत्पादकांना फटका.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण.
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान
अमेरिका-इस्त्रायल-इराण संघर्षामुळे जळगावातील केळी शेतकऱ्यांचे नुकसान.
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर
खामेनींच्या मृत्यूनंतर दिल्लीतील इराण दूतावासातील झेंडा अर्ध्यावर.
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे खरबूजाची बाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल.
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं
एक जागा, तीन पक्ष; राज्यसभा उमेदवारीवर महाविकास आघाडीत खलबतं.
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो...
शरद पवार एनडीएसोबत जाणार का? संजय राऊत म्हणाले, खात्रीने सांगतो....
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?
अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालात काय?.
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूरात महापौर निवडीवरून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन.
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमधील कलाकेंद्रात मोठा राडा अन् तोडफोड,नेमकं काय घडलं?.