AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Accident | धावत्या रेल्वेस आग, प्रवाशांनी मारल्या उड्या

Railway Accident | अहमदनगर सोलापूरच्या ट्रॅकवर धावत्या रेल्वेला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. ही आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. परंतु रेल्वेला आग लागल्यानंतर प्रवाशांनी धावत्या गाडीतून उड्या मारल्या.

Railway Accident | धावत्या रेल्वेस आग, प्रवाशांनी मारल्या उड्या
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Oct 17, 2023 | 9:12 AM
Share

अहमदनगर | 17 ऑक्टोंबर 2023 : अहमदनगर आणि आष्टी हा महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. या मार्गावर एका पॅसेंजर ट्रेनला सोमवारी अचानक आग लागली. ही रेल्वे अहमदनगरहून आष्टीकडे निघाली होती. त्यावेळी या पॅसेंजर ट्रेनला अहमदनगर सोलापूर ट्रॅकवर वाळूंजजवळ आग लागली. रेल्वेच्या पहिल्या दोन बोगींना ही आग लागली. ही आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. घटनास्थळी अग्नीशमन दलाचे बंब दाखल झाले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीमुळे घाबरलेल्या प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. त्यात काही जणांना किरकोळ जखमी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुर्घटना घडली नाही.

प्रवाशांना मारल्या उड्या

अहमदनगर आणि आष्टी दरम्यान इंजिनानंतरच्या दोन डब्यांना आग लागली. आग लागल्याची घटना घडली तेव्हा गाडीत जास्त प्रवाशी नव्हते. ही आग इतकी भीषण होती की त्यात 2 बोगी जळून खाक झाल्या. ही रेल्वे अहमदनगर जिल्ह्यातच धावत होती. गाडीत केवळ पाच प्रवासी उपस्थित होते. त्यांना आग लागल्याचे लक्षात येताच ते घाबरले. त्यांनी धावत्या रेल्वेतून बोगीतून उड्या मारल्या. त्यात ते किरकोळ जखमी झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अग्नीशमन दलाचे बंब पोहचले

आगीच्या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सुमारे 1 लाख लिटर पाण्याचा मारा करून 2 बोगींवरील आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळे लागली त्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून अद्याप देण्यात आली नाही. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.

गर्दी नसल्यामुळे टळली मोठी घटना

अहमदनगर आणि आष्टी दरम्यान वाळूंजजवळ रेल्वेच्या डब्याला आग लागली तेव्हा या गाडीत गर्दी नव्हती. गाडीत गर्दी असती तर मोठी दुर्घटना घडली असती. अहमदनगर आष्टी दरम्यान या रेल्वे सेवेला प्रवाशांचा फारसा प्रतिसाद नाही. यामुळे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, या घटनेची रेल्वे विभागाकडून चौकशी करण्यात येणार आहे.

Follow Us
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके