सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चीनच्या मुद्द्यावर सडेतोड शब्दात आपली भूमिका व्यक्त केली (Ajit Pawar on India China tension and boycott).

सव्वाशे कोटी नागरिकांनी चीनची एकही वस्तू वापरु नये, चीन जागेवरच येईल : अजित पवार
Follow us
| Updated on: Jun 23, 2020 | 2:56 PM

मुंबई : भारत आणि चीनमधील तणावानंतर देशात महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं ज्याने चीनसोबतच्या आपल्या प्रकल्पांना स्थगिती दिली. यावर प्रश्न विचारला असता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सडेतोड शब्दात आपली भूमिका व्यक्त केली (Ajit Pawar on India China tension and boycott). जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने बघते, त्यांच्या विरोधात कारवाई करायलाच हवी. नागरिकांनीही चिनी वस्तूंचा वापर करु नये, असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, “जे राष्ट्र आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहते, आपल्याविरोधात कुरबुरी काढतं अशा राष्ट्रांच्या विरोधात कडक भूमिका घेतली पाहिजे. उलट आपल्या नागरिकांनी चीनमध्ये तयार झालेली एकही वस्तू वापरु नये. आपल्या देशातील सव्वाशे कोटी जनतेने जर असं केलं तर चीन जागेवरच येईल.”

“11 लाख शेतकरी पीक कर्जमाफीमध्ये बसत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे अडचणी आल्या आहेत. शेतकऱ्यांना 8 हजार कोटी रुपये वितरित करण्यासाठी बँकांना हमी दिली आहे. आपण टेस्टिंग वाढविल्या असल्याने रोज बाधित असणाऱ्यांची संख्या वाढल्याचे दिसून आले आहे. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त इतरांना देखील रेल्वे सुरु करा, अशी मागणी आहे. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. ग्रामीण भागात कामे सुरु झाली आहेत,” असं अजित पवार यांनी सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी कोकणाच्या मदतकार्यावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “कोकणाची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेतली असता दुर्गम भागातील वाड्या आणि काही ठिकाणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या शिवाय अशा ठिकाणी मोफत रॉकेल देण्याबाबत निर्णय झाला आहे.”

अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरु करण्याविषयी देखील स्पष्टपणे भूमिका मांडली. ते म्हणाले, “जोपर्यंत राज्य सरकारला खात्री होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करुन राज्यातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.”

“रामदेवा बाबांच्या कोरोना औषधावर ज्याचा विश्वास त्यांनी ते घ्यावं”

अजित पवार यांनी रामदेव बाबा यांच्या कोरोनावरील आयुर्वेदिक औषधावरही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, “बाजारात अनेकजण कोरोनावर औषध आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रामदेव बाबांनी कोरोनावर औषध आणलं आहे. ज्यांचा त्यांच्या औषधांवर विश्वास आहे त्यांनी ते घ्यावं.”

हेही वाचा :

नवी मुंबई महापालिका आयुक्तांची तडका फडकी बदली, अभिजित बांगर नवे आयुक्त

सोलापुरात कोरोना मृतांची संख्या 40 ने वाढून 217 वर, लपवाछपवी प्रकरणी रुग्णालयांना नोटीस

पतंजलीकडून कोरोनावरील Coronil औषध लाँच, 7 दिवसात रुग्ण बरा होण्याचा दावा

Corona Medicine : औरंगाबादच्या होलसेल मेडिकलमध्ये फेबीफ्लूचे औषध दाखल

Ajit Pawar on India China tension and boycott

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.