जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर

वीजबिल वसुलीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, असं उत्तर त्यांनी दिलं (Ajit Pawar on Excess Electricity bill),

जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, वीजबिल वसुलीवर अजित पवारांचं उत्तर
Follow us
| Updated on: Jan 30, 2021 | 7:30 PM

अहमदनगर : वीजबिल वसुलीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. ते आज श्रींगोदा येथे आले होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांनी त्यांना वीजबिल वसुलीबाबत प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी वीज पंपासाठी सवलत सरकार देत असल्याचं त्यांनी सांगितलं (Ajit Pawar on Excess Electricity bill).

अजित पवार नेमकं काय म्हणाले?

“जे काही ठरलं असेल ते मला माहित नाही. मात्र आम्ही पन्नास टक्के शेतकऱ्यांना वीज पंपांकरता सवलत दिली आहे. त्यामध्ये हजारो कोटी रुपये महावितरण कंपनी सहन करणार आहे. शेवटी हे चालवण्याकरता निधी लागतो. तरी देखील काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांकरता माफ केले आहेत”, असं मोठं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीगोंधा येथे पत्रकारांसोबत बोलताना केलं (Ajit Pawar on Excess Electricity bill).

राजू शेट्टींचा सरकारला इशारा

दरम्यान, वीजबिल सक्त वसुल करण्याच्या धोरणावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. “लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करण्याऐवजी जर सक्तीने वीज कनेक्शन तोडणार असाल तर आम्हाला सुद्धा दोन हात करण्याशिवाय पर्याय नाही. वीज कनेक्शन कट करुन दाखवाच जनतेतून काय प्रतिक्रिया उमटतील ते तुम्हाला कळेलच”, असं राजू शेट्टी म्हणाले.

“लॉकडाऊन काळातील तीन महिन्यांचं घरगुती वीजबिल माफ करावं, अशी भूमिका घेऊन जून महिन्यापासून आम्ही सातत्याने आंदोलन करत आहोत. शहरी असो किंवा ग्रामीण असो, महाराष्ट्रीतील 1 कोटी 35 लाख कुटुंबांना लाभ मिळू शकतो. ही माफी घेतल्याशिवाय गप्प बसायचं नाही, ही आमची भूमिका आहे. या मागणीसाठी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत आमची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनादेखील काल आम्ही भेटलो. आम्ही सर्वांना निर्वाणीचा इशारा दिला आहे”, असं राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा : ठाकरे सरकार पिंजऱ्यातून बाहेर पडत नाही, शिवसेना सर्व बटण दाबून करते, नारायण राणेंनी फटकारले

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.