AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या विम्याचं काय झालं ?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत विमान अपघातात निधन झालेले त्यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. जाधव यांचा 1 कोटी रुपयांचा अपघात विमा मंजूर झाला आहे. मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले जाधव 28 जानेवारी रोजी कर्तव्य बजावत असताना बारामतीजवळ अपघाताला बळी पडले. वडिलांच्या उपचारांसाठी गावी जाण्याची त्यांची इच्छा होती, पण अखेरचा निरोप आईला देऊन ते परतलेच नाहीत.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या विम्याचं काय झालं ?
अजित पवारांसह त्यांच्या अंगरक्षकाचाही वििमान अपघातात मृत्यू झाला.
| Updated on: Feb 05, 2026 | 8:27 AM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला एक आठवडा उलटला आहे. गेल्या बुधवारी (28 जानेवारी) त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यात अजित पवार यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांच्यासह आणखी चौघेही मृत्यूमुखी पडले. त्यात अजित पवारांचे पीएसओ (PSO) विदीप जाधव, विमानाचे 2 पायलट आणि फ्लाईट अटेंडंट यांचाही समावेश होता. दरम्यान अजित पवार यांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्याबद्दल एक अपडेट समोर आली आहे. जाधव यांचा 1 कोटींचा अपघात विमा मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांनी ‘न्यू इंडिया इन्शुरन्स’ या कंपनीचा अपघात विमा घेतला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पहिल्या आठवड्यात कंपनीने अपघात विम्याचा दावा मंजूर केला आहे. विदीप जाधव हे 2009 सालच्या तुकडीचे असून ते मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. ते 2014 ते 2019 या वर्षांच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा पथकात कार्यरत होते. तर गेल्या काही काळापासू ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अंगरक्ष म्हणून कार्यरत होते.

सांभाळून कामावर जा लवकर घरी ये.. घरच्यांनी दिला होता निरोप

विदीप जाधव हे मुंबईतील कळव्यात रहात होते. घटनेच्या दिवशी ते बाहेर पडले,तीच त्यांच्या कुटुंबियाशी शेवटची भेट ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, जाधव हे कळवा विटावा सूर्यनगर ,शनिवार पार्क जवळ श्रीकृष्ण विहार खोली क्रमांक 9 येथे कुटुंबीयांपासून गेल्या 25 वर्षांपासून रहात होते. त्यांचे आई -वडील, पत्नी, मुलगा मुलगी असा त्यांचा परिवार होता. ते मुंबई पोलिस दलात कार्यरत होते आणि अजित पवार यांचे अंगरक्षक म्हणून काम करत होते. 28 जानेवारी रोजी सकाळी 6 च्या सुमारास कामासाठी ते घराबाहेर पडले. तेव्हा सांभाळून कामावर जा, लवकर ये असा निरोप त्यांच्या आईने लेकाला दिला होता. मात्र त्यानतंर जाधव परत आलेच नाहीत, विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी घरी थडकली आणि संपूर्ण कुटुंब दु:खात बुडालं.

वडिलांच्या उपचारांसाठी गावी जायचं होतं

मिळालेल्या माहितीनुसार, विदीप जाधव यांना वडिलांच्या उपचारासाठी गावी जायचे होते. त्यांचे गाव बारामतीपासून 25 किमी अंतरावर फलटण तालुक्यात तरडवाडी आहे. त्यामुळे त्यांनी अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजीच्या दौऱ्याची ड्युटी घेतली होती. बारामतीहून ते गावी जाणार होते. तसे त्यांनी अजित पवार यांना सांगितलं देखील होतं. घरी येतो असं त्याने गावी कळवलं होतं. पण अजित पवार यांच्यासोबतच विमानतील तो त्यांचा शेवटचा प्रवास ठरला.

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.