AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Pawar: अजित पवारांचं पुन्हा वळसे पाटलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं, गृहमंत्रालयाला हे माहितच असायला हवं होतं!

गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला हवी होती. त्यांचंच तर ते काम आहे. त्यांनी माहिती द्यायला हवी होती. असं म्हणत अजित पवार यांनी गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमारच केला.

Ajit Pawar: अजित पवारांचं पुन्हा वळसे पाटलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं, गृहमंत्रालयाला हे माहितच असायला हवं होतं!
अजित पवारImage Credit source: tv9
| Updated on: Jun 23, 2022 | 7:59 PM
Share

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) हे आता शेवटच्या घटका मोजत आहे. शिवसेने नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकार मध्ये राहणार नाही अशी भूमिकाच घेत हे सरकार आता पडणार असल्याचेच जाहीर केलं. तर आता आणखीन दोन शिवसेनेच आमदार गुवाहाटीत दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यावरून आता राजकारण रंगू लागले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे केले आरोप खोडून काढले. तर याचवेळी त्यांनी ही बंडखोरी होत असताना गृहमंत्रालयाला याची माहिती नव्हती असे म्हणत गृहमंत्रालयावर (Home Ministry) तोशोरे ओढले आहेत. तर यामधून दिलीप वळसे-पाटीलांच्या गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं उभे केले आहेत.

गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमार

राज्यात राजकीय भूकंप झाल्यानंतर जनतेसह महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही मित्र पक्ष चिंतेच्या गर्तेत गेले होते. कारण महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे गटनेतेच हे तब्बल 43 आमदार घेऊन पसार झाले होते. त्यांनी या बंडखोरीचे कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे म्हटलं होते. त्याचदरम्यान या बंडात शिवसेनेचे दुसरे नेते आणि राज्यगृहमंत्री शंभूराज देसाई हे ही असल्याने आता गृह मंत्रालयावर प्रश्न चिन्हं उभे केले जात आहेत. तर जे काही घडत असेल त्यांची माहिती ही पोलिसांना कशी नसणार. आणि जर माहिती नव्हतीतर त्यांनी ती मिळवली का नाही? आणि जर काही माहिती होतीच तर ती गृहमंत्र्यालायला का दिली नाही? गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी माहिती द्यायला हवी होती. त्यांचंच तर ते काम आहे. त्यांनी माहिती द्यायला हवी होती. असं म्हणत अजित पवार यांनी गृह मंत्रालयावर प्रश्नांचा भडिमारच केला. याच बरोबर त्यांनी दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेही प्रश्नार्थक बोटं करत, त्यांची सेक्युरिटी काय करत होती असा सवाल केला. तर अधिकारी काय करत होती. हा विचार करण्याचा आणि त्यावर संशोधन करण्याचा विषय असल्याचे म्हटलं आहे.

आम्ही आघाडीला पाठिंबा दिला होता

त्याचबरोबर अजित पवार यांनी पुन्हा स्पष्ट केले की, आमचा आम्ही पाठिंबा काढणार नाही. आम्ही आघाडीला पाठिंबा दिला होता. तर उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाला पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहोत. नाना पटोले यांनी काय विधान करावं हा त्यांचा अधिकार असल्याचेही अजित पवार म्हणाले. तर कोण काय म्हणाले, याचा मला काय घेणं देणं नाही असेही अजित पवार म्हणाले. त्याचबरोबर आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये असल्याचा सांगताना आताच्या घडीलाही त्यांच्याबरोबर सत्तेतच आहोत असेही त्यांनी म्हटलं आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.