AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांचा अपघात की घातपात? सरपंचाच्या व्हिडीओचा हवाला देत जयंत पाटील काय म्हणाले? खळबळ उडवणारं वक्तव्य

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मर्जरसाठी अजितदादांचे प्रयत्न सुरु होते आणि तेच आग्रही होते. मात्र, निवडणूकांचा कार्यक्रमच असा एका पाठोपाठ जाहीर केला की मर्जरसाठी कोणताही चान्सच ठेवला नसल्याचे देखील राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

अजितदादांचा अपघात की घातपात? सरपंचाच्या व्हिडीओचा हवाला देत जयंत पाटील काय म्हणाले? खळबळ उडवणारं वक्तव्य
jayant patil statement on ajitdada pawar accident
| Updated on: Jan 31, 2026 | 8:42 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर राजकारण ढवळून निघाले होते. या अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा या आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकात दरम्यान सुरु झाल्या होत्या.अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूका लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांचे मिलन होण्याबद्दल शरद पवार यांच्या पक्षातील नेतेच वक्तव्य करताना दिसत होते. मात्र, काल अजितदादा यांच्या अस्थि विसर्जनानंतर लागलीच राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होऊन अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी राजी झाल्या. त्यानंतर आज शनिवारी लोकभवनात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याआधी शरद पवार यांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी अजितदादांच्या अपघाताबद्दल खळबळजनक वक्तव्य केले आहे.

जयंत पाटील यावेळी म्हणाले की पहाटे साडे तीन चारला निघून साडे सातला मी तिथे पोहचलो. अजितदादाही आले. अन्य आमचे नेतेही आले. पक्षाचे अध्यक्ष शशिकांत शिंदेही तिथे आले आणि अजितदादाही आले. अजितदादांनी आम्हाला सांगितले होते की बरोबर येताना मी सुनील तटकरेंना बरोबर घेऊन येतो. मात्र काही कारणांनी ते आले नाहीत असे त्यांनी त्यावेळी सांगितले. त्यानंतर तेथे सांगितले आपण लवकरात लवकर हा निर्णय घेऊ. मात्र, निवडणूक आयोगाने नगर पालिकांच्या निवडणूका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी महापालिकेच्या निवडणूका जाहीर केल्या, त्या संपायच्या आधी, जिल्हा परिषदेच्या निवडणूका जाहीर केल्या. म्हणजे मर्जरला कुठे संधी मिळू नये अशी त्यावेळी परिस्थिती निर्माण झाल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की मात्र, अजितदादांनी सांगितले की निवडणूका झाल्यानंतर आपण हा निर्णय जाहीर करु.दुसऱ्यांदा १७ तारखेला पवार साहेबांच्या गोविंद बागेतील निवास स्थानी आम्ही सर्व भेटलो. ते म्हणाले की ५ ला निवडणूका आहेत. ७ निकाल लागणार आहेत. ८ ते ९ ला आपण मर्जर करु. परंतू मी सांगितले की मी ८ -९ तारखेला बाहेर आहे. त्यावर अजितदादा म्हणाले की जयंतराव म्हणतात तर १२ ला बैठक ठेवूया.

असा आमचा १२ तारखेचा दिवस ठरला.अजितदादांनी हेही मला सांगितले की कोणा-कोणाशी चर्चा केलेली आहे. नेत्यांची आणि आमदारांशी चर्चा केली आहे. आमदारांची याला संमती आहे हेही अजितदादांनी आम्हाला सांगितले. पवार साहेबांच्या उपस्थितीत दोन्ही पक्ष वेगळे झाले होते, त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र करु आणि पुन्हा महाराष्ट्रात एकदिलाने काम करु असा अजितदादांचा आग्रह होता. दुदैवाने त्यांचा अपघाती निधन झाले,त्यांची अंतिम इच्छा ही होती असे आता म्हणावे लागेल असेही जयंत पाटील यावेळी म्हणाले. निवडणूकांचा आयोगातील कोणाशी तरी माझे बोलणे झाले होते की आम्हाला मर्जरसाठी चार दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी केली होती. त्यानंतर जि.प. निवडणूका घ्या अशी मागणी केली होती.

जयंत पाटील म्हणाले की अजितदादा म्हणाले होते की चिंता करु नका, माझे ४० मधले ३८ ते ३९ आमदार मी जे बोलेल ते ऐकतील. मी सगळ्याशी बोलणे केल्यानंतर आपण शिक्कामोर्तब करु असे ते म्हणाले. हे माझे पाच महिन्यापूर्वी बोलणे झाले होते. आता १६ तारखेला ते म्हणाले, मी सगळ्यांशी बोललो आहे. आता आपण शिक्कामोर्तब करु असे अजितदादा म्हणाले.

एकत्र आल्यावर सत्तेत ज्यायचे का ? की अलिप्त राहायचे यावर काही चर्चा झाली होती का असा प्रश्न विचारला असता जयंत पाटील म्हणाले की दादांना जाऊन तिसरा-चौथा दिवस आहे. त्यांचे सुतक आहे. त्यांचे दिवस पूर्ण झाल्याशिवाय काही राजकीय भाष्य करणे योग्य होणार नाही.योग्य वेळी त्यावर मी भाष्य करेल. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी घाई-घाईने झाला याबद्दल विचारले असता अजितदादा म्हणाले की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा पक्षातला अंतर्गत निर्णय आहे. त्यांच्या पक्षातील निर्णयाबद्दल मी बोलणे योग्य नाही.

असे कधी घडलेले नाही

अजितदादांच्या अपघाताबद्दल विचारले असता जयंत पाटील म्हणाले की, आपण तिथल्या सरपंचाचा एक व्हिडीओ पाहिला. विमान तेथे आले त्यावेळी विचित्र आवाज आला आणि विमान घिरट्या घेऊन कोसळल्याचे सरपंच एका व्हिडीओ म्हणाले आहेत. असे कधी झालेले मी कधीही पाहिले नव्हते. विमान धावपट्टीवर आल्यानंतर ते सरळ ग्लायडर होऊन खाली उतरले असते. त्यावेळी कोणते मशिन बंद पडले. इंजिन बंद पडले का ? मी त्यातला तज्ञ्ज नाही. मात्र, आता याचा उलगडा ब्लॅक बॉक्समधून होईल अशी आम्हाला आशा असल्याचे ते म्हणाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं