केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच सरकार, तरीही पाणी सोडलं नाही : संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी या महापुरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. या कामाचं लष्कराकडूनही कौतुक झालं. यानंतर टीव्ही 9 मराठीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच सरकार, तरीही पाणी सोडलं नाही : संभाजी भिडे
Follow us
| Updated on: Aug 13, 2019 | 7:59 PM

सांगली : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून लवकर पाणी सोडलं नाही आणि त्याचा फटका सांगलीला बसला. केंद्रात, राज्यात आणि कर्नाटकातही यांचंच (भाजप) सरकार आहे. पण तरीही लवकर पाणी सोडलं नाही हे खरंच दुर्दैवी आहे. पाणी लवकर सोडलं असतं तर ही हानी टाळता आली असती, अशा शब्दात शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी या महापुरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं. या कामाचं लष्कराकडूनही कौतुक झालं. यानंतर टीव्ही 9 मराठीने संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांची प्रतिक्रिया जाणून घेतली.

“या महापुरात जे शक्य होतं, तेवढं शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलं. हे काम सर्वांनी मिळून केलंय. आता सर्वांनी मिळून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही विडा उचलणार आहोत. गेल्या 70 वर्षातील राज्यकर्त्यांनी चांगल्या सवयी लावल्या नाहीत. प्रशासन दोषी असलं तरी पूर्णपणे त्यांना दोषी धरता येणार नाही. राज्यकर्ते नीट वागले नाही. अजूनही राज्यकर्ते निवडून देताना विचार करण्याची गरज आहे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“या महापुरामुळे लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. एकमेकांना मदत करुन या परिस्थितीवर मात करण्याची गरज आहे. कर्नाटक सरकारने अलमट्टीतून विसर्ग लवकर केला असता तर ही परिस्थिती उद्भवली नसती. देशात, कर्नाटकात आणि महाराष्ट्रातही यांचंच सरकार असून लवकर पाणी सोडलं नाही हे दुर्दैवी आहे. लवकर पाणी सोडायला पाहिजे होतं,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

“स्व. राजाराम बापू पाटील यांनी जी संल्पना त्या काळी सरकारसमोर ठेवली होती, सरकने ती संकल्पना त्यावेळी राबवली असती तर आताचं संकट आलं नसतं. अजूनही ती संकल्पना राबवता येईल. पाणी अडवून कराड येथील खुगाव येथे धरण करावं, ते पाणी सांगोला किंवा इतर दुष्काळी भागाला द्यावं, शेतकरीही सुखी होईल आणि संकटही टाळता येईल,” असंही संभाजी भिडे म्हणाले.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.