AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पराभव रणजित पाटलांचा, पण भाजपचा कलह राष्ट्रवादीनं सांगितला; पदवीधरवरून आता राजकारण तापलं…

जर भविष्यात पूर्ण निवडणूक बॅलेट पेपरद्वारा घेतल्या गेल्या तर भाजपच विषारी रोपटं पूर्णतः नष्ट होऊन जाईल असा खरमरीत टोला त्यांनी त्यांना लगावला आ

पराभव रणजित पाटलांचा, पण भाजपचा कलह राष्ट्रवादीनं सांगितला; पदवीधरवरून आता राजकारण तापलं...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Feb 03, 2023 | 11:51 PM
Share

अकोला : विधानसभेच्या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण प्रचंड तापले आहे. नागपूर आणि नाशिकच्या जागेवरुन कोण बरोबर आणि कोण चुक याची गोळाबेरीज मांडली जात आहेत. त्यातच अमरावती पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या पराभवामुळे राजकारण कसे केले गेले आहे, त्याची माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी सांगितले आहे. आमदार अमोल मिठकरी यांनी राजकारणाची दुसरी बाजू सांगताना त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावरच आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अकोल्यातील भाजपच्या अदृश्य शक्तीने (नेत्यांनी) मोठी मदत केली आहे, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानत असल्याचे अमोल मिठकरी यांनी म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, पक्षांतर्गत असलेल्या नाराजीमूळ आज रणजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या अदृश्य शक्तींचा मोठा हात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

तर राज्यात भाजपला मिळालेला पराभव पाहत असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

तसेच पोटनिवडणुकीसाठीही ती निवडणूक बिनविरोध घ्यावी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रडत आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

जर भविष्यात पूर्ण निवडणूक बॅलेट पेपरद्वारा घेतल्या गेल्या तर भाजपच विषारी रोपटं पूर्णतः नष्ट होऊन जाईल असा खरमरीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या पदवीधर निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना सांगितले की, त्या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक हरल्याचे चित्र उभा केले जाते आहे. मात्र त्या ठिकाणी भाजप जर पूर्ण ताकदीनिशी उतरली असती तर तिथे भाजपचाच विजय झाला असता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर अमोल मिठकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....