पराभव रणजित पाटलांचा, पण भाजपचा कलह राष्ट्रवादीनं सांगितला; पदवीधरवरून आता राजकारण तापलं…

जर भविष्यात पूर्ण निवडणूक बॅलेट पेपरद्वारा घेतल्या गेल्या तर भाजपच विषारी रोपटं पूर्णतः नष्ट होऊन जाईल असा खरमरीत टोला त्यांनी त्यांना लगावला आ

पराभव रणजित पाटलांचा, पण भाजपचा कलह राष्ट्रवादीनं सांगितला; पदवीधरवरून आता राजकारण तापलं...
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 11:51 PM

अकोला : विधानसभेच्या निवडणुकीवरून राज्याचे राजकारण प्रचंड तापले आहे. नागपूर आणि नाशिकच्या जागेवरुन कोण बरोबर आणि कोण चुक याची गोळाबेरीज मांडली जात आहेत. त्यातच अमरावती पदवीधर मतदार संघाचे उमेदवार रणजित पाटील यांच्या पराभवामुळे राजकारण कसे केले गेले आहे, त्याची माहिती आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी सांगितले आहे. आमदार अमोल मिठकरी यांनी राजकारणाची दुसरी बाजू सांगताना त्यांनी थेट भारतीय जनता पक्षावरच आरोप केला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, अमरावती पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी अकोल्यातील भाजपच्या अदृश्य शक्तीने (नेत्यांनी) मोठी मदत केली आहे, त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार मानत असल्याचे अमोल मिठकरी यांनी म्हटले आहे.

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, पक्षांतर्गत असलेल्या नाराजीमूळ आज रणजीत पाटील यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्या अदृश्य शक्तींचा मोठा हात असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.

तर राज्यात भाजपला मिळालेला पराभव पाहत असताना आता देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.

तसेच पोटनिवडणुकीसाठीही ती निवडणूक बिनविरोध घ्यावी म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे रडत आहेत असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

जर भविष्यात पूर्ण निवडणूक बॅलेट पेपरद्वारा घेतल्या गेल्या तर भाजपच विषारी रोपटं पूर्णतः नष्ट होऊन जाईल असा खरमरीत टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरच्या पदवीधर निवडणुकीच्या निकालाविषयी बोलताना सांगितले की, त्या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या बालेकिल्ल्यात निवडणूक हरल्याचे चित्र उभा केले जाते आहे. मात्र त्या ठिकाणी भाजप जर पूर्ण ताकदीनिशी उतरली असती तर तिथे भाजपचाच विजय झाला असता असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्यानंतर अमोल मिठकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका करताना त्यांनी जोरदार टीका केली आहे. त्यामुळे त्यांनी बॅलेट पेपरची मागणी केली आहे.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.