AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू
| Updated on: Aug 25, 2024 | 10:44 AM
Share

Amravati Nagpur Highway Accident : अमरावती नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. तर 28 प्रवासी जखमी झाले आहेत. गाईला वाचवण्याच्या प्रयत्नात शिवशाही बसचा अपघात झाल्याचे बोललं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एका शिवशाही बसला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होती की बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. यात 25 ते 30 प्रवाशी प्रवास करत होते.

एकाचा मृत्यू, 28 प्रवासी जखमी

ही बस नागपूरहून अकोल्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्गावर क्रमांक 6 वर एक गाय या बसच्या मध्ये आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

या अपघातामुळे अमरावती-नागपूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बसच्या चालकाने सांगितला घटनाक्रम

मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण माझी गाडी पलटी झाली. माझ्या बसमध्ये एकूण 35 प्रवाशी प्रवास करत होते. त्यातील 28 जण जखमी झाले आहेत, अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त झालेल्या शिवशाही बसच्या चालकाने दिली.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.