AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 14, 2023 | 6:10 PM
Share

अमरावती : शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे पहिली सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. त्यानंतर आता दुसरी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येतील. १६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे.

बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीही ते शिंदे यांच्यासोबत आले. प्रहार संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत. या माध्यमातून ते विदर्भात काम करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असली तर यातून फायदा हा काँग्रेसला होईल. यातून ठाकरे गटाला फार काही मिळणार नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत तिन्ही पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहतील, हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

यांना मिळेल संजीवनी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल. असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावला. संजीवनी उद्धव गांधी यांच्या रुपाने मिळेल, अशी राहुल गांधी यांना अपेक्षा असेल. पण, राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर सामान्य व्यक्तीवर काही फरक जाणवला नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पदयात्रेचा फरक पडला नाही. त्यांनी पदयात्रा काढल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काही परिणाम होईल, असं वाटत होतं. पण, तो काही झालेला दिसला नाही. त्यामुळे जनतेवर कसा परिणाम होईल, हा सवाल असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

जनतेवर कसा परिणाम होणार?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.

Follow Us
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.