AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
| Edited By: Govinda Hatwar | Updated on: Apr 14, 2023 | 6:10 PM
Share

अमरावती : शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे पहिली सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. त्यानंतर आता दुसरी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येतील. १६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे.

बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीही ते शिंदे यांच्यासोबत आले. प्रहार संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत. या माध्यमातून ते विदर्भात काम करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असली तर यातून फायदा हा काँग्रेसला होईल. यातून ठाकरे गटाला फार काही मिळणार नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत तिन्ही पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहतील, हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

यांना मिळेल संजीवनी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल. असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावला. संजीवनी उद्धव गांधी यांच्या रुपाने मिळेल, अशी राहुल गांधी यांना अपेक्षा असेल. पण, राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर सामान्य व्यक्तीवर काही फरक जाणवला नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पदयात्रेचा फरक पडला नाही. त्यांनी पदयात्रा काढल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काही परिणाम होईल, असं वाटत होतं. पण, तो काही झालेला दिसला नाही. त्यामुळे जनतेवर कसा परिणाम होईल, हा सवाल असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

जनतेवर कसा परिणाम होणार?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.

Follow Us
री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून...
Kalyan Collapsed Building | री-डेव्हलपमेंटचा बेफिकीर खेळ! भर रस्त्यात कोसळली इमारत; खिडकीतून उडी मारून...
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय
मोठी बातमी! ठाकरेंच्या गटातील नगरसेविका शिंदे सेनेच्या वाटेवर? राजकीय घडामोडींना वेग
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंत
विनायक राऊत यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप, गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर विशेष पथक स्थापन, आता...
तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
Pandharpur | आषाढी वारीत सायकल वारीची धूम! तब्बल 7 हजार सायकलवरून पंढरी गाठणाऱ्या वारकऱ्यांचा उत्साह पाहाच
नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात
Nita Ambani | नीता अंबानी ठरल्या मोस्ट पॉवरफुल वुमन 2026, मुंबईतील भव्य कार्यक्रमात बहुमान!
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
भारतासह इतर देशांचे 650 विमान उड्डाण रद्द; अचानक... नेमकं काय घडतंय?
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा
जाता पंढरीशी सुख वाटे जिवा... संत सोपानदेवांच्या पालखीने धरला पंढरीचा मार्ग
मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
Moshi Building Collapsed | मोशी इमारत दुर्घटनेत 9 जणांनी गमावला जीव; अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली
'मातोश्री'बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलता
'मातोश्री' बंगल्यावरही बंगाली बाबा... विनायक राऊतांच्या प्रकरणावर बोलताना नेत्याचा मोठा खुलासा!
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना...
एकच खळबळ! दूध नाही नुसता पावडर, 200 हुन अधिक दूध संकलन केंद्रांना... FDA ची धडक कारवाई