AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2023 | 6:10 PM
Share

अमरावती : शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे पहिली सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. त्यानंतर आता दुसरी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येतील. १६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे.

बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीही ते शिंदे यांच्यासोबत आले. प्रहार संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत. या माध्यमातून ते विदर्भात काम करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असली तर यातून फायदा हा काँग्रेसला होईल. यातून ठाकरे गटाला फार काही मिळणार नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत तिन्ही पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहतील, हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

यांना मिळेल संजीवनी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल. असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावला. संजीवनी उद्धव गांधी यांच्या रुपाने मिळेल, अशी राहुल गांधी यांना अपेक्षा असेल. पण, राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर सामान्य व्यक्तीवर काही फरक जाणवला नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पदयात्रेचा फरक पडला नाही. त्यांनी पदयात्रा काढल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काही परिणाम होईल, असं वाटत होतं. पण, तो काही झालेला दिसला नाही. त्यामुळे जनतेवर कसा परिणाम होईल, हा सवाल असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

जनतेवर कसा परिणाम होणार?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.