AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका

उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी टोला लगावला.

उद्धव ठाकरे यांच्यामुळे यांना संजीवनी मिळेल, बच्चू कडू यांची खोचक टीका
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 14, 2023 | 6:10 PM
Share

अमरावती : शिंदे गट शिवसेनेतून वेगळा झाल्यापासून उद्धव ठाकरे गट कमकुवत झाला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सभा घेतल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीचे पहिली सभा झाली. या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले अनुपस्थित होते. त्यानंतर आता दुसरी महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित येतील. १६ एप्रिल रोजी ही सभा होणार आहे.

बच्चू कडू हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. तरीही ते शिंदे यांच्यासोबत आले. प्रहार संघटनेचे ते प्रमुख नेते आहेत. या माध्यमातून ते विदर्भात काम करत आहेत. महाविकास आघाडी एकत्र असली तर यातून फायदा हा काँग्रेसला होईल. यातून ठाकरे गटाला फार काही मिळणार नाही, असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं. वज्रमुठ सभा नागपुरात होत आहे. या सभेत तिन्ही पक्षांचे कोणते नेते उपस्थित राहतील, हे दोन दिवसांतच स्पष्ट होईल.

यांना मिळेल संजीवनी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे काँग्रेसला संजीवनी मिळेल. असा टोला बच्चू कडू यांनी लगावला आहे. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीची चर्चा सुरू आहे. यावरून बच्चू कडू यांनी हा टोला लगावला. संजीवनी उद्धव गांधी यांच्या रुपाने मिळेल, अशी राहुल गांधी यांना अपेक्षा असेल. पण, राहुल गांधी यांच्या पदयात्रेनंतर सामान्य व्यक्तीवर काही फरक जाणवला नाही.

काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पदयात्रेचा फरक पडला नाही. त्यांनी पदयात्रा काढल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते फुटायला लागले. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा काही परिणाम होईल, असं वाटत होतं. पण, तो काही झालेला दिसला नाही. त्यामुळे जनतेवर कसा परिणाम होईल, हा सवाल असल्याचं बच्चू कडू म्हणाले.

जनतेवर कसा परिणाम होणार?

शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्या भेटीकरिता काँग्रेस नेते राहुल गांधी मातोश्रीवर येणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत खोचक प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा त्यांच्या कार्यकर्त्यांवरच परिणाम पडला नाही तर जनतेवर कसा पडणार? असा सवाल उपस्थित केला. शिवसेनेमुळे काँग्रेसला नव संजीवनी मिळत असेल तर ही चांगली गोष्ट असल्याचेही यावेळी कडू म्हणाले.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.