AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपाल नियुक्त १२ पदांसाठी ६०० जणांना व्हायचंय आमदार, या प्रतिष्ठित व्यक्तींचा व्यवसाय काय?

साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण या क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्त राज्यपालांनी विधान परिषदेसाठी करतात. या दिग्गजांचा समाजाला फायदा व्हावा, असा यामागचा उद्देश आहे.

राज्यपाल नियुक्त १२ पदांसाठी ६०० जणांना व्हायचंय आमदार, या प्रतिष्ठित व्यक्तींचा व्यवसाय काय?
| Edited By: | Updated on: May 01, 2023 | 8:25 PM
Share

अमरावती : विधान परिषदेसाठी काही आमदार नियुक्त करण्याचा अधिकार हा राज्यपालांकडे असतो. त्यासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती राज्यपालांकडे अर्ज करत असतात. त्यापैकी आवश्यक असलेले आमदार निवडण्याचा अधिकार राज्यपाल यांना असतो. गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदार अद्याप निवडण्यात आले नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १२ आमदारांच्या नावांची यादी प्रलंबित ठेवली. आता नवीन सरकार आलं. परंतु, अद्याप राज्यपाल नियुक्त आमदार नियुक्त करण्यात आले नाहीत. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे.

तहसीलदार, डॉक्टर यांनी केलेत अर्ज

अमरावतीतील माहिती अधिकार कार्यकर्ते योगेश पखाले यांनी राज्यपाल कार्यालयाकडे (Raj Bhavan) १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत माहिती मागितली होती. त्यावर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या जागेसाठी जवळपास 600 अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. या अर्जामध्ये तहसीलदार, डॉक्टर, पीएचडी धारक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश आहे.

नियुक्त्या का रखडल्या याची माहिती मिळाली नाही

आरटीआय कार्यकर्ते योगेश पखाले म्हणाले, आमदारांच्या पदाकरिता काही सर्वसामान्य लोकांनी अर्ज केले होते का, ही माहिती मी मागितली होती. तसेच 12 आमदारांच्या नियुक्ती का रखडल्या याची माहिती मागितली होती. ती माहिती मात्र मिळाली नाही.

हे प्रतिष्ठित म्हणतात, आम्हाला आमदार करा

तहसीलदार, डॉक्टर, पीएचडीधारक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, महिला तसेच महाराज यांचा देखील समावेश आहे. त्यांचे म्हणणं आहे की आम्हाला देखील आमदार करा. उच्चशिक्षित लोकांनी देखील मागणी केली आहे. त्यामुळे त्यांना आमदार केल्यास सर्वसामान्य लोकांच्या समस्या सुटतील, असं संबंधितांचं म्हणणं आहे.

सत्ताधारी पक्षाची शिफारस महत्त्वाची

साहित्य, कला, क्रीडा, समाजकारण या क्षेत्रातील दिग्गजांची नियुक्त राज्यपालांनी विधान परिषदेसाठी करतात. या दिग्गजांचा समाजाला फायदा व्हावा, असा यामागचा उद्देश आहे. वास्तविक सत्ताधारी पक्षांनी शिफारस केलेल्या व्यक्तींची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली जाते. सत्ताधारी पक्ष राज्यपालांकडे यांना आमदार करावे, अशी यादी पाठवते. त्यानंतर राज्यपाल योग्य तो निर्णय घेतात.

Follow Us
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला
भोंदूबाबाच्या विरोधात आणखी एका महिलेची तक्रार,निर्लज्जतेचा कळसच गाठला.
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?
भोंदूबाबा खरात याला एसआयटीने अज्ञातस्थळी हलवले, काय नेमके कारण?.
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?
उद्धव ठाकरे यांचे मातोश्रीत खासदारांशी गुफ्तगू , डॅमेज कंट्रोलसाठी ?.
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप
चाकणकरांना खरात लिंग पिसाट आहे हे माहिती होते, तृप्ती देसाई यांचा आरोप.
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?
अशोक खरातला धरणाचे पाणी कोणी दिलं ? मुख्यमंत्र्यांनी काय दिला इशारा?.
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले
भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा आणि पैसेही गेले,शेतकऱ्याने सांगितले.
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा
दर अमावस्या आणि पौर्णिमेला खरात गावात यायचा, गावकऱ्यांनी मांडली व्यथा.