AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया

नीट पेपरफुटीप्रकरणी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि तरुणांच्या आंदोलनावर आता अमृता फडवणीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणाल्या, ते जाणून घ्या..

नीट पेपरफुटीप्रकरणात विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर अमृता फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
अमृता फडणवीसImage Credit source: Tv9
| Updated on: Jul 25, 2026 | 10:37 AM
Share

नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ठाम आहे. प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थी आंदोलक जंतर-मंतरवरून हटणार नाहीत, अशी अट सीजेपीच्या प्रतिनिधींनी केंद्र सरकारला घातली आहे. त्यामुळे शुक्रवारी केंद्रीय मंत्री जेपी नड्डी, जितेंद्र सिंह यांच्यासोबत सीजेपीच्या प्रतिनिधींची झालेल्या चर्चेतून काही तोडगाच निघाला नाही. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने 24 तासांची मुदत मागितली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

“आंदोलन जोपर्यंत नीट पेपरफुटीबद्दल आहे, तोपर्यंत ते योग्य आहे. त्याबद्दल आधीपासूनच सरकार बॅकस्टेज काम करतंय. पेपरफुटीच्या दोषींवर ते कारवाई करत आहेत. सोबत ते विविध बदलसुद्धा आणत आहेत. विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची खबरदारी सरकार घेत आहे. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे,” अशी प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

दरम्यान दिल्लीतल्या विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये शुक्रवारी सीजेपीचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्याशी जवळपास दोन तास चर्चा केली. सीजेपच्या तीन मागण्यांपैकी पहिल्या दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याची माहिती त्यांनी बैठकीनंतर दिली. आंदोलक विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणं आणि नीट पेपरफुटीनंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देणं, या दोन पहिल्या मागण्या होत्या. तर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल केंद्र सरकारने वेळ मागून घेतली आहे. वरिष्ठ नेतृत्वाशी चर्चा करून आमचा निर्णय शनिवारी दुपारी 3.30 वाजेपर्यंत कळवू असं नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सीजेपीचे प्रवक्ते सौरव दास यांनी दिली. त्यामुळे आज दुपारी केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच