AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

कोकणातली सर्वात मोठी आंगणेवाडीची यात्रा रद्द, काय आहे ही यात्रा?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Feb 08, 2021 | 8:07 PM
Share

मुंबई : कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची यात्रा यावर्षी रद्द करण्यात आली आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सामंत यांनी सांगितलं. त्याचबरोबर कोरोनाची नियमावली पाळून आंगणेवाडीच्या यात्रेत फक्त धार्मिक विधी केले जातील, असं देखील त्यांनी सांगितलं (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

“आंगणेवाडीच्या जत्रा 6 मार्चला निश्चित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’च्या धर्तीवर ‘माझी जत्रा, माझी जबाबदारी’ अशी मोहिम राबवण्याचं ठरवलं आहे. भराडीदेवीची यात्रा भाविकांसाठी बंद राहील. मात्र, धार्मिक कार्यक्रम दोन दिवस सुरू राहणार आहेत. धार्मिक कार्य कसं करायचं यावर आज तिथल्या मंडळाची माझ्याबरोबर बैठक झाली”, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

“ट्रस्टची आणि पालकमंत्री म्हणून माझी भाविकांना विनंती आहे, यात्रेकरूनी यावर्षी दर्शनासाठी येऊ नये. त्याचबरोबर आंगणेवाडी ट्रस्टने हा निर्णय घेतला आहे. आम्ही यात्रेकरूना नम्र विनंती करतो त्यांनी आम्हाला सहकार्य करावं”, असं आवाहन सामंत यांनी केलं (Anganwadi yatra cancelled this year due to corona pandemic).

आंगणेवाडी विकास मंडळाचे पदाधिकारी भास्कर आंगणे यांनीदेखील यावेळी प्रतिक्रिया दिली. “यावर्षी आंगणेवाडीची जत्रा साध्या पद्धतीने साजरा केली जाणार आहे. यापूर्वी डिसेंबर महिन्यात तारीख जाहीर केली होती. तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा होता. तेव्हाच आम्ही यात्रा आंगणे कुटुंबियांसाठी मर्यादीत ठेवण्याचा निर्णय घेतला”, असं भास्कर आंगणे यांनी सांगितलं.

आंगणेवाडीची यात्रा नेमकी आहे तरी काय?

आंगणेवाडी ही मसुरे गावातील वाडी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मसुरे हे सर्वात मोठे गाव आहे. आंगणेवाडीची यात्रा सिंधुदुर्गासह देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्यासह देशभरातील नागरिक येतात. ही यात्रा दोन दिवसांची असते. विशेष म्हणजे कोणतीही तिथी बघून यात्रेची तारीख ठरवली जात नाही तर देवीचा कौल घेऊन तारीख ठरवली जाते. या यात्रेला लाखो भाविक भराडी देवीच्या दर्शनाला येते. भराडी देवी नवसाला पावते, अशी ख्याती आहे.

हेही वाचा : आनंदाचा हॅशटॅग #आंगणेवाडीजत्रा

Follow Us
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी...
मी विधानपरिषदेसाठी इच्छुक होतो पण...नाराजीच्या चर्चेनंतर राजन साळवी पहिल्यांदाच बोलले, सगळं सांगून टाकलं!
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री
खासगी बंगला अन् जंगी रेव्ह पार्टी, तरणी पोरं चक्क...पुण्यात भर रात्री अभद्र कांड; धाड टाकताच...
अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा
Video | अपहरण झालेल्या तरुणाची फिल्मी स्टाईलने पाठलाग करून सुटका, पोलिसांचा व्हायरल व्हिडीओ तुफान चर्चेत
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज,
यंदाचा मान्सून ठरणार आव्हानात्मक? हवामान विभागाचा मोठा अंदाज, मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
बापरे! गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...
बापरे! यंदा गणेशमूर्ती घ्यायची म्हटलं की खिसा होणार खाली, किंमत तब्बल...युद्धाचा मोठा फटका!
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरे
सुनेत्रा पवारांच्या रिक्त जागी भाजपच्या नवनीत राणा दिसणार? सुनिल तटकरेंचं थेट विधान, राज्यासभेतील जागेसंदर्भात नवीन ट्वीस्ट
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ..
एकच खळबळ! अल्पवयीन मुलीची अवैधरित्या प्रसूती, परस्पर विकलं नवजात बाळ अन्... थरकाप उडवणारी घटना
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मो
शिंदेंच्या शिवसेनेचा मविआला जबर धक्का, माघार घेणाऱ्या त्या नेत्याला मोठं गिफ्ट; राजकारणात खळबळ!
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर प
महागाईचा आणखी एक झटका! घरगुती गॅस सिलेंडर 29 रुपयांनी महागलं, कितीवर पोहोचला आकडा?
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन;
आता थेट नाव घ्या... संजय शिरसाटांचं सुप्रिया सुळेंना खुलं आवाहन; उमेदवारांच्या माघारीमुळे राजकारण पेटलं