AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना सोबत घ्यावे, एकनाथ शिंदेंना दूर करावे, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती…अंजली दमानियांचे भाकीत काय?

संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करुन त्यांचा राजीनामा होतील, अशी मला अपेक्षा आहे.

अजित पवारांना सोबत घ्यावे, एकनाथ शिंदेंना दूर करावे, देवेंद्र फडणवीस यांची रणनीती...अंजली दमानियांचे भाकीत काय?
Anjali Damania
| Updated on: Feb 11, 2025 | 12:37 PM
Share

राज्यातील राजकारणात येत्या दोन महिन्यांत मोठे बदल होणार आहेत. सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जवळीक वाढत आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना बाजूला केले जात आहे. भाजपने त्यांचा वापर केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी सुरु केलेल्या ज्या योजना होत्या त्या आता बंद केल्या जात आहेत. अजित पवार यांना जवळ घेऊन एकनाथ शिंदे यांना दूर करण्याची देवेंद्र फडणवीस यांची रणनीती दिसत आहे, असे राजकीय विश्लेषण समाजसेविका अंजली दमानिया यांनी केले आहे. ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते मांडली.

पोलिसांकडूनच आरोपींना मदत?

संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना अंजिल दमानिया म्हणाल्या, मी सीसीटीव्ही फुटेज पाहिलेले आहेत. तीन महिने जुने हे सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी गाडीतून उतरून पळून जात आहेत. पुढे पोलिसांचा फौजफाटा आहे. नाकाबंदी आहे. त्यामुळे आरोपींना पळून जाण्यासाठी पोलिसांनी टीप तर दिली नाही ना? असा संशय निर्माण होत असल्याचे दमानिया यांनी म्हटले.

धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार

संतोष देशमुख प्रकरणात पोलिसांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात मी अनेक पुरावे दिले आहेत. आता आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत धनंजय मुंडे यांच्या चौकशीची घोषणा करुन त्यांचा राजीनामा होतील, अशी मला अपेक्षा आहे, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

धनंजय देशमुख यांचाही आरोप

संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख म्हणाले, आतापर्यंत जो घटनाक्रम आहे, जे सीसीटीव्ही आले आहे त्यावर आम्ही अगोदर बोललो आहे. हे सगळे आरोपी वाशीच्या हद्दीतून गाडी सोडून पळाले आहेत. पोलीस त्यांच्या मागे होते. पोलिसांना आरोपी कोणत्या जंगलातून पळून गेले ते माहीत हवे होते. जंगलातून निघण्यासाठी 2-3 मार्ग आहेत, त्या मार्गांवर पोलिसांना रेकी ठेवायला हवी होती, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

भावाचा खून झाला, त्याचे कोणतेही गांभीर्य पोलिसांना नव्हते. सीआयडीकडे तपास येईपर्यंत हे प्रकरण पोलिसांकडून सहज घेतले जात होते. आम्ही वारंवार सांगत होतो, ऍक्शन घ्या, कॉल रेकॉर्डिंग काढा, सीडीआर काढा, पण दखल घेतली जात नव्हती. पोलिसांना आरोपीचे कॉल का येत होते? त्याची चौकशी करावी, असे धनंजय देशमुख यांनी म्हटले.

राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.