Ajit Pawar : कोणतीही धमकी गांभीर्यानं घेतली पाहिजे, अजित पवार यांची राज्य सरकारकडून अपेक्षा

प्रदीप गरड

|

Updated on: Aug 20, 2022 | 10:03 AM

अजित पवार दोन दिवसीय अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मेळघाटातील बालमृत्यू, तेथील स्थानिकांच्या समस्या याचा आढावा घेणार आहेत. मागील काही दिवसांत कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याविषयी काय उपाययोजना करता येतील, याचा ते आढावा घेणार आहेत.

Ajit Pawar : कोणतीही धमकी गांभीर्यानं घेतली पाहिजे, अजित पवार यांची राज्य सरकारकडून अपेक्षा
विरोधी पक्षनेते अजित पवार

अमरावती : कोणतीही धमकी (Threat) गांभीर्याने घेतली पाहिजे. कोणतेही सरकार असो, धमकी आल्यानंतर केंद्र सरकारने तपास यंत्रणांसह यामागे कोणती शक्ती आहे, याचा शोध घ्यायला हवा, तत्काळ अशा घटनांची दखल गांभीर्याने घ्यावी, अशी अपेक्षा विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली आहे. ते अमरावतीत बोलत होते. अजित पवार दोन दिवसीय अमरावती (Amravati) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मेळघाटातील बालमृत्यू, तेथील स्थानिकांच्या समस्या याचा आढावा घेणार आहेत. मागील काही दिवसांत कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. त्याविषयी काय उपाययोजना करता येतील, याचा ते आढावा घेणार आहेत. त्यासोबतच पूरपरिस्थिती आणि अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले आहे. त्यासंबंधी मदत आणि इतर बाबींचाही आढावा आपल्या या दौऱ्यात अजित पवार घेणार आहेत.

मुंबईत आला धमकीचा मेसेज

26/11सारखाच दहशतवादी हल्ला करू, अशी धमकी नुकतीच मुंबई ट्रॅफिक कंट्रोल रूमला फोनवरून आली आहे. व्हाट्सअॅपवर मेसेजच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्यापार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. केंद्र सरकारच्या ज्या तपास यंत्रणा आहेत, त्यांनी पण याच्यामध्ये लक्ष द्यावे. कोणत्याही राज्याला अशाप्रकारे धमक्या येतात, त्यावेळी केंद्रापासून सर्वांनीच याच्या पाठी कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा, असे अजित पवार म्हणाले. अशा घटनांमागे कोणी अतिरेकी आहेत का, कारण जगात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे सरकार याची गांभीर्याने घेईल, अशी आम्हाला आशा आहे. याबाबत ते सकारात्मक पावले उचलतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

‘सहा जणांची मदत घेणार’

हरिहरेश्वरमध्ये सापडली होती शस्त्रास्त्र असलेली बोट

रायगडच्या हरिहरेश्वर किनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी संशयास्पद बोट आढळून आली होती. यात बोटीमध्ये शस्त्रदेखील सापडले होते. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात अलर्ट जारी करण्यात आला होता. तपासानंतर ही बोट ओमानची असल्याची माहिती समोर आली. ही बोट भरकटली होती. नेपच्युन मेरिटाइम सिक्युरिटी या कंपनीने ही माहिती दिली. जूनमध्ये ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या, त्यापैकी ही एक बोट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या बोटीवर 3 एके 47 रायफली ( AK 47 rifles) आणि जिवंत काडतुसांचा साठा हाती लागला होता. अशा घटनांसह धमकी आल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी राज्य सरकारकडून अशा घटनांचे गांभीर्य असायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI