AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“सर्टिफिकेटबाबत तक्रार आली तर चौकशी करु, बड्या मंत्र्याचं सूचक विधान,” समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ?

"समीर वानखेडेंना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्याबाबत कोणी तक्रार केली, तर त्याची चौकशी करू. सामाजिक न्याय विभागाकडे कोणी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल. ही चौकशी जातपडताळणी कायद्याप्रमाणे केली जाईल," असे धनंजय मुंडे म्हणाले.

सर्टिफिकेटबाबत तक्रार आली तर चौकशी करु, बड्या मंत्र्याचं सूचक विधान, समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार ?
sameer wankhede
| Edited By: | Updated on: Oct 29, 2021 | 11:17 PM
Share

मुंबई : मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर खंडणी तसेच चुकीचे कागदपत्रे सादर करुन अनुसूचित जाती प्रवर्गाचे लाभ घेतल्याचा आरोप केला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मोठं विधान केलंय. वानखेडे यांना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्याबाबत जर कोणी तक्रार केली तर त्याची चौकशी केली जाईल, असं मुंडे यांनी म्हटलंय.

चौकशी जातपडताळणी कायद्याप्रमाणे केली जाईल

“समीर वानखेडेंना जे सर्टिफिकेट देण्यात आलंय त्याबाबत कोणी तक्रार केली, तर त्याची चौकशी करू. सामाजिक न्याय विभागाकडे कोणी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल. ही चौकशी जातपडताळणी कायद्याप्रमाणे केली जाईल,” असे धनंजय मुंडे म्हणाले.

नवाब मलिक यांनी काय आरोप केले ?

नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “वानखेडे यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली असून एका गरीब अनुसूचित प्रवर्गाच्या पात्र विद्यार्थ्याची नोकरी त्यांनी हिसकावून घेतली आहे. त्यांचा जन्माचा दाखला आणि जात प्रमाणपत्र खोटं निघालं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. एक अल्पसंख्याक उमेदवार बनावट दाखले सादर करुन अनुसुचित प्रवर्गातून अधिकारी झाला. असा आरोप मलिक यांनी वानखेडे यांच्यावर केला. तसेच याच न्यायाने 15 कोटी मुस्लिमांना अशी नोकरी मिळेल काय?”, असा सवालदेखील त्यांनी केला.

नवाब मलिक यांनी काय मागणी केली ?

खोटे कागदपत्रे सादर करुन वानखेडे यांनी नोकरी बळकावली असा आरोप मलिक यांनी केलेला आहे. आपला आरोपात सत्यता आहे, हे दाखवण्यासाठी मलिक अनेक दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कागदपत्रे सादर करत आहेत. याच कागदपत्रांच्या आधारे त्यांनी वानखेडे यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावलेलं आहे. मुस्लीम व्यक्तीने धर्मांतर केले असेल तर त्याला शेड्युल कास्टचा लाभ घेता येत नाही, असा महाराष्ट्र शासनाचा नियम आहे. वानखेडे यांचा दाखला बोगस असून त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी नवाब मलिक यांनी केलीय.

दरम्यान, मलिक यांनी केलेले सर्व आरोप वानखेडे यांनी फेटाळून लावलेले आहेत. तसेच चौकशी करावी सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया वानखेडे यांनी दिलेली आहे. या सर्व घडामोडीनंतर आता धनंजय मुंडे यांनी प्रमाणपत्राची चौकशी करण्याचे संकेत दिल्यामुळे वानखेडे यांच्या अडचणी वाढणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

आर्यनच्या सुटकेचा सस्पेन्स आणि हाय व्होल्टेज ड्रामा; दिवसभरात नेमकं काय घडलं?

Juhi Chawla And Shah Rukh Khan | आर्यनसाठी जुही चावला जामीनदार, शाहरुख खान आणि जुहीची केमिस्ट्री काय?; वाचा सविस्तर

”तो शिवसेनेचा कलेक्टर, त्याच्या उत्पन्नातून एसटी चालेल एवढं त्याने कमावलंय”, नारायण राणेंचा प्रहार

(appropriate action will be taken in someone complaint about ncb officer sameer wankhede document said dhananjay munde)

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.