AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘संविधान खरंच खतरे में है…’, नाशिकमधून अरविंद सावंत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल

नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

'संविधान खरंच खतरे में है...',  नाशिकमधून अरविंद सावंत यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 9:43 PM
Share

नाशिकमध्ये भगवान महावीर जनकल्याण सोहळा आणि महावीर जयंती निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  भारतीय लोकशाहीचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते. संसदेमध्ये विरोधकांना पण ऐकलं जात होतं. तेव्हा प्रसिद्धी माध्यमं वेगळी होती,  दूरदर्शन आले क्रांती झाली, नव नवे प्रसिद्धी माध्यमं आले आणि त्यानंतर लोकशाहीचे प्रश्न निर्माण झाले, असं यावेळी सावंत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले अरविंद सावंत? 

अरविंद सावंत यांनी या कार्यक्रमात बोलताना भाजप आणि महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मोदी साहेब नतमस्तक होऊन सभागृहात आले, तेव्हा वाटले लोकशाहीचा आता सन्मान होईल, २०२४ मध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना प्रोत्साहन द्या असं  मी सांगितले होते, एक रेल्वे अपघात झाला तर लाल बाहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता, मात्र इथेतर रेल्वेचे एवढे अपघात झाले.

संविधान खरच खतरे में है, वक्फचा कायदा आणला, इथे नफेखोरांचे राज्य आहे. सेवेचं राज्य नाही. मुंबईतली बिल्डिंग कोसळी तरी चर्चा झाली नाही,  कुंभमेळ्यात एवढी लोक गेली त्याचं काय झालं? आम्हाला तर 30 चाच आकडा सांगितला होता. आम्हाला सभागृहात चर्चा करू दिली नाही. 2014 पूर्वी जीएसटीला कोणी विरोध केला? आधार कार्डला कोणी विरोध केला होता?  जेव्हा रुपयामध्ये घसरण सुरू होती, तेव्हा हे तेव्हाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांना काय बोलले होते? कायदा करतात त्यातून न्याय द्यायचा आहे की त्रास?  राजीव गांधी यांनी पक्षांतर बंदी कायदा का आणला? त्यानुसार दोन तृतीयअंश सदस्यांना पक्षांतर करता येतं, असा नियम बनवला आहे. मात्र हे दोन तृतीयअंश कुठे गेले, सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्याला गेले तिथे कोणाचं राज्य आहे? असा सवालही यावेळी सावंत यांनी उपस्थित केला. भाजपमध्ये आता छोट्या मनाची माणसे आहेत, आता देशातील सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी पक्ष कोणता असेल तर तो भाजप आहे, असा भ्रष्टाचार करतात की समजत पण नाही, असा टोला यावेळी सावंत यांनी भाजपला लगावला आहे.

Follow Us
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15  वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात...
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन खचली, चक्क 233...
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
Raj Thackeray | Power Corrupts...; राज ठाकरेंची पोस्ट व्हायरल! अमित साटम प्रकरणावर सरकारला घेरलं
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप
Andheri Veera Desai Road | मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप, दुकानदारांचे मोठे नुकसान
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच पदाधिकाऱ्याचं
मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य
हाहाकार! मुसळधार पावसामुळे विरार महापालिका परिसर पाण्याखाली; थेट मुख्य कार्यालयात...
मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा....
धो धो येतो आणि झोडतच राहतो... मुंबई उपनगरात पावसाची तुफान बॅटिंग! प्रशासनाचा घराबाहेर न पडण्याचा इशारा
मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत सुरू असलेल्या
DCM Health Update | मोठी अपडेट समोर! उपमुख्यमंत्री रात्री उशीरा 1 वाजेपर्यंत पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात असतानाच...
दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! तक्रारी करूनही BMC झोपेत
Mumbai | दादर फुल मार्केटवर कोसळला 100 वर्ष जुना वड! वारंवार तक्रारी करूनही BMC झोपेत; थोडक्यात...
ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी..
Thane Rain | ठाण्यात पावसाचा रौद्रावतार! रेड अलर्टनंतर रस्ते जलमय, शाळांना सुट्टी जाहिर