AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुचाकीला कट मारला, दोघांनी बदला म्हणून थेट रिक्षाच पेटवली

रिक्षाचा गाडीला धक्का लागला त्यावेळी रिक्षाचालक नाईक आणि दुचाकीवर असलेल्या तांदळे आणि फसाळे यांच्यात वाद झाला होता.

दुचाकीला कट मारला, दोघांनी बदला म्हणून थेट रिक्षाच पेटवली
Image Credit source: Google
| Updated on: Sep 28, 2022 | 4:46 PM
Share

नाशिक : दुचाकीला रिक्षाचालकाने कट मारला म्हणून दुचाकीवर असलेल्या दोघांनी बदला म्हणून थेट ऑटोरिक्षाच (Auto Rickshaw) जाळून टाकली आहे. नाशिकच्या (Nashik) अमृतधाम परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान रिक्षाचालक रोहित रमेश नाईक यांनी आडगाव पोलीस (Nashik Police) ठाण्यात याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार हिरावाडी येथे राहणाऱ्या अनिल तांदळे आणि विजय फसाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित म्हणून त्यांची नावे दाखल आहेत. रिक्षाचालक रोहित नाईक सोमवारी रात्री प्रवासी सोडून आपल्या घराकडे निघालेले असतांना संबंधित प्रकार घडला आहे. नाईक यांच्या एमएच 15 एफयू 8266 या रिक्षाचा कमलनगर बस स्टॉप येथे संशयित अनिल तांदळे आणि विजय फसाळे यांच्या गाडीला धक्का लागला होता.

रिक्षाचा गाडीला धक्का लागला त्यावेळी रिक्षाचालक नाईक आणि दुचाकीवर असलेल्या तांदळे आणि फसाळे यांच्यात वाद झाला होता.

आपापसात झालेल्या वादावर दोघांकडून घटनास्थळी पडदा पडला होता. यावेळी रिक्षाचालक नाईक हे घरी निघून गेले होते.

मात्र, नाईक हे घरात असतांना बाहेर उभी असलेल्या रिक्षावर बाटलीत आणलेले पेट्रोल ओतून दिले आणि आग लावली. नंतर नाईक यांचा दरवाजा वाजवून निघूल गेले.

नाईक यांच्यासह परिसरातील नागरिकांनी लागलीच पेटलेली रिक्षा विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. घटनेत रिक्षाचे जवळपास पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या घटनेनं मात्र परिसरात एकच खळबळ उडाली असून रिक्षा पेटवणाऱ्यांना पोलीसांनी धडा शिकवावा अशी मागणी होत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आडगाव पोलीस याबाबत अधिकचा तपास करीत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.