AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आंदोलनस्थळी, दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘अशा घटना घडतात तेव्हा ते…’

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी तातडीने जालना येथे जाऊन मराठा आंदोलकांची भेट घेतली. नंतर त्यांनी राज्यसरकारवरही टीका केली. त्यावरून शरद पवार यांचे एकेकाळचे सहकारी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोठे विधान केले आहे.

शरद पवार आंदोलनस्थळी, दिलीप वळसे पाटील म्हणाले, 'अशा घटना घडतात तेव्हा ते...'
DILIP VALSE PATIL AND SHARAD PAWARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 02, 2023 | 10:33 PM
Share

मुंबई : 2 सप्टेंबर 2023 | जालना येथे मराठा समाजाच्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये सुमारे तीनशेहून अधिक आंदोलक जखमी झाले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात मराठा समाजाने आंदोलन सुरु केले आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने जालना जिल्ह्यात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलकांशी बोलताना शरद पवार यांनी राज्यसरकारवर टीका केली. त्यावरून राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठे विधान केले आहे.

जालना येथे जी घटना घडली त्याची योग्य चौकशी व्हायला हवी. ही घटना घडली ती व्ह्यायला नको होती. राज्य सरकार मराठा समाजासोबत आहे. अशा वेळी विरोधी पक्षाकडून राजकारण केले जाते असे वाटत नाही. शासनाचे प्रतिनिधी कुणी तरी जालनामध्ये जातील. पण, अशावेळी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री यांची मागणी होत असते, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

जालनामध्ये जी काही घटना घडली. त्याप्रकारची प्रकरणे अधिक समजदारपणे हाताळायला पाहिजे. काही घटक अशा घटनांचा फायदा घेतात. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे, पण, अशी घटना ज्यावेळेस घडते त्यावेळेस पोलिसांनी खूप संयमाने परिस्थिती हाताळावी लागते असे वळसे पाटील यांनी सांगितले.

मराठा समाजाचे आंदोलन सुरु असताना पोलिसांनी एवढी आक्रमक भूमिका का घेतली हा चौकशीचा भाग आहे असे ते म्हणाले. या घटनेची चौकशी केल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत जाता येणार नाही. काल तिथं काय गडबड झाली हे चौकशीअंती समोर येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

लाठीचार्ज झाल्याची माहिती मिळताच शरद पवार तातडीने जालना येथे गेले, हा राजकारणचा भाग आहे का असे विचारल्यावर त्यांनी सांगितले, समाजामध्ये असे काही घटक असतात ज्यांना समाजामधील शांतता बिघडवाची असते आणि त्याचा फायदा ते घेत असतात. पवार साहेब लोकांच्या भावना समजून घेण्यासाठी जालना येथे गेले आहेत. ज्या वेळेस अशा घटना घडतात तेव्हा ते लगेच तिथे जातात. समाजामध्ये नेहमी हे वेगळी भूमिका मांडतात त्यातून हे घडल असावं असे ते म्हणाले.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...