AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!

ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या आणि दरोडेखोरांपासून गावकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कन्नड पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. येथील गावकऱ्यांना त्यांनी अत्याधुनिक सायरन दिला आहे. धोका जाणवल्यास नागरिक या सायरनने पोलीस आणि इतर गावकऱ्यांना जागं करू शकतील.

धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!
देवगाव रंगारी येथील गावकऱ्यांना सायरनचे वाटप
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 7:00 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे गाव-खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, फक्त एक हाक मारा, असा संदेश देत ग्रामीण पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. ग्रामस्थांनी हाक पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सायरनही दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

धोका जाणवला की वाजवा सायरन

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाणे परिक्षेत्रात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ताडपिंपळगाव, देवगाव, जेहूर, औराळा, टाकळी या मोठ्या गावांसह लहान गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 15 जणांना सायरनचे वितरण करण्यात आले.

पोलीस पाठिशी असल्याची ग्रामस्थांची भावना

आपले घर किंवा वस्तीवर मध्यरात्री कुणी अनोळखी आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास किंवा परिसरात एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास घराच्या छतावर लावलेला सायरन वाजवण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाबद्दल बोलताना जेहूर येथील नागरिक म्हणाले, शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सायरन खूप फायदेशीर आहे. देवगाव रंगारी येथील देविदास जाधव यांच्या घरावर दोन सायरन बसवण्यात आले आहेत. याचा आवाज 1 ते दीड किमीपर्यंत जातो.

‘गुन्ह्यांना आळा बसेल’

देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्यासाहेब भालेराव म्हणाले, पोलीस महानिरीक्षकांची ही मूळ संकल्पना आहे. शेत, वाडी वस्त्यांवर जी एकटी कुटुंबे राहतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होत आहे. सायरनचे बटण दाबताच परिसरातील लोक, पोलीस मदतीला येऊ शकतात. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल.

इतर बातम्या-

आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?

Ahmednagar : पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?-थोरात

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.