AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!

ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या आणि दरोडेखोरांपासून गावकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी कन्नड पोलिसांनी अनोखा उपक्रम राबवला आहे. येथील गावकऱ्यांना त्यांनी अत्याधुनिक सायरन दिला आहे. धोका जाणवल्यास नागरिक या सायरनने पोलीस आणि इतर गावकऱ्यांना जागं करू शकतील.

धोका जाणवला की सायरन वाजवा, औरंगाबाद ग्रामीण पोलिसांचा अभिनव उपक्रम, वाचा सविस्तर!
देवगाव रंगारी येथील गावकऱ्यांना सायरनचे वाटप
| Edited By: | Updated on: Dec 26, 2021 | 7:00 AM
Share

औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे गाव-खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, फक्त एक हाक मारा, असा संदेश देत ग्रामीण पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. ग्रामस्थांनी हाक पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सायरनही दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.

धोका जाणवला की वाजवा सायरन

कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाणे परिक्षेत्रात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ताडपिंपळगाव, देवगाव, जेहूर, औराळा, टाकळी या मोठ्या गावांसह लहान गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 15 जणांना सायरनचे वितरण करण्यात आले.

पोलीस पाठिशी असल्याची ग्रामस्थांची भावना

आपले घर किंवा वस्तीवर मध्यरात्री कुणी अनोळखी आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास किंवा परिसरात एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास घराच्या छतावर लावलेला सायरन वाजवण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाबद्दल बोलताना जेहूर येथील नागरिक म्हणाले, शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सायरन खूप फायदेशीर आहे. देवगाव रंगारी येथील देविदास जाधव यांच्या घरावर दोन सायरन बसवण्यात आले आहेत. याचा आवाज 1 ते दीड किमीपर्यंत जातो.

‘गुन्ह्यांना आळा बसेल’

देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्यासाहेब भालेराव म्हणाले, पोलीस महानिरीक्षकांची ही मूळ संकल्पना आहे. शेत, वाडी वस्त्यांवर जी एकटी कुटुंबे राहतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होत आहे. सायरनचे बटण दाबताच परिसरातील लोक, पोलीस मदतीला येऊ शकतात. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल.

इतर बातम्या-

आधी नितेश राणेंचं म्याव, म्याव, मग मलिकांचा कॉकटेल ‘कोंबडा’ आणि आता पुन्हा राणेंकडून ‘डुक्कर’, ट्विट, राजकारणाचा स्तर घसरतोय?

Ahmednagar : पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?-थोरात

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.