AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे ‘वरातीमागून घोडे’!

अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल होईल.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारचे 'वरातीमागून घोडे'!
| Updated on: Dec 16, 2020 | 7:46 AM
Share

औरंगाबाद: अतिवृष्टीमुळं मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं. अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन वाहून गेलं. ऊस आडवा झाला. कापूस आणि भूईमुगाचंही मोठं नुकसान झालं. काहींची तर जमीन खरडून गेली. अशावेळी शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज होती. पण राज्य सरकारनं जाहीर केलेली मदत अद्यापही शेतकऱ्यांच्या हातात पडली नाही. त्यात आता केंद्र सरकार वरातीमागून घोडे नाचवताना पाहायला मिळत आहे. (Center’s team will arrive in Marathwada after 2 months to inspect the damage by heavy rains)

अतिवृष्टीनं नुकसान झाल्यानंतर आता 2 महिन्यांनी केंद्र सरकारचं पथक नुकसानाची पाहणी करण्यासाठी येणार आहे. 20 आणि 21 डिसेंबर रोजी केंद्राचं पथक मराठवाड्यात दाखल होईल. या पथकानं नुकसानाची पाहणी केल्यानंतर मग राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. केंद्र सरकारचं हे पथक मराठवाड्यातील नुकसानाची दोन दिवस पाहणी करेल. पण अतिवृष्टी आणि झालेल्या नुकसानाला आता 2 महिने उलटून गेले. आता हे पथक काय पाहणी करणार? आणि शेतकऱ्यांना काय मदत मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकऱ्यांना पडला आहे.

राज्य सरकारकडून 10 हजार कोटीचं पॅकेज

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या या दु:खावर फुंकर घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 23 ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत 10 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली. त्यामध्ये रस्ते, पिकांचं झालेलं नुकसान, वीजेचे पडलेले खांब, खरडून गेलेली जमीन, पडलेली घरं या सर्व बाबींसाठी ही मदत असेल, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. पण ही मदत अद्यात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही. त्यात दिवाळीसारखा सणही शेतकऱ्यांना मदतीविनात घालवावा लागला.

शेतकऱ्यांना मदत नेमकी कशी?

मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेल्या घोषणेनुसार कोरडवाहू आणि बागायती जमिनीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे.

ही मदत दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत मिळणार आहे.

म्हणजे ५ एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना २० हजार रुपयांची मदत मिळेल.

अतिवृष्टीमुळं फळबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळं फळबागांसाठी प्रति हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा

दोन हेक्टर क्षेत्राच्या मर्यादेत ही मदत मिळणार आहे.

मृत व्यक्तीच्या वारसांना, मयत पशुधनासाठी आणि घर पडझडीसाठीही भरीव मदत देण्याची घोषणा मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली आहे.

१० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजचं विभागवार विभाजन

रस्ते आणि पूल – २ हजार ६३५ कोटी

नगरविकास – ३०० कोटी

महावितरण उर्जा – २३९ कोटी

जलसंपदा – १०२ कोटी

ग्रामीण रस्ते आणि पाणीपुरवठा – १ हजार कोटी

शेती आणि घरांसाठी – ५ हजार ५०० कोटी

एकूण – ९ हजार ७७६ कोटी रुपये

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारची मोठी घोषणा, अतिवृष्टीग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर

पश्चिम महाराष्ट्रातील पुरावेळी केंद्राकडून 900 कोटीही आले की नाही शंका, संभाजीराजेंचं भाजपकडे बोट

Center’s team will arrive in Marathwada after 2 months to inspect the damage by heavy rains

पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.