AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबादमधील नव्या जलवाहिनीच्या कामाला गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई, कंत्राटदाराला इशारा

1680 कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे काम सुरु आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे.

औरंगाबादमधील नव्या जलवाहिनीच्या कामाला गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई, कंत्राटदाराला इशारा
प्रातिनिधीक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Oct 21, 2021 | 3:16 PM
Share

औरंगाबादः शहरात सुरु असलेल्या नव्या जलवाहिनीचे (New pipeline, Aurangabad) काम पावसामुळे रखडले होते. मात्र आता पावसाळा संपला असून कामांना गती द्या, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या (मजिप्रा) अधिकाऱ्यांनी हैदराबाद येथील जेव्हीपीआर (JVPR) कंपनीला दिला आहे. राज्य सरकारने 1680 कोटी रुपयांचा निधी दिल्यानंतर शहरात नव्या जलनाहिनीच्या कामांना सुरुवात झाली होती. मात्र सततच्या पावसामुळे हे काम अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरु आहे. आता नोव्हेंबरमध्ये औरंगाबादमधील मुख्य जलवाहिनीच्या कामाला सुरुवात होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

1680 कोटी रुपयांची योजना

महाविकास आघाडी सरकारने शहरासाठी 1680 कोटी रुपयांची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे या योजनेवर काम सुरु आहे. हैदराबाद येथील जेव्हीपीआर कंपनीला काम देण्यात आले आहे. त्यानुसार कंपनीने सहा महिन्यांपूर्वीच शहरात कामाला सुरुवात केली आहे. शहरात 15 जलकुंभ उभारण्याचे काम प्रगतीपथावर असून आणखी 5 जलकुंभांचे काम सुरु करण्यात आले आहेत.

शहरातच पाइपची फॅक्ट्री

या जलवाहिनीच्या योजनेत जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत 8 फूट व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. या पाइपची लांबी आणि रुंदी बरीच असल्याने तो इतर ठिकाणहून वाहून आणण्यास प्रचंड त्रास झाला असता. म्हणून पाइप औरंगाबादेत तयार केले जाणार आहेत. नोव्हेंबरपर्यंत मुख्य जलवाहिनीचे पाइप तयार होतील, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी कंत्राटदाराने नक्षत्रवाडीजवळ पाइप तयार करण्याची फॅक्ट्री उभारण्याचे काम सुरु केले आहे. या ठिकाणी पत्र्याचे शेड उभारले जात असून दोन मशीन आणण्यात आल्या आहेत.

योजनेची आणखी काय वैशिष्ट्ये?

– या योजनेतून शहराला 604 एमएलडी पाणी मिळेल. – योजनेअंतर्गत शहराला 2052 सालापर्यंत लाभ मिळेल. – पाणीपुरवठ्यासाठी शहराला दरमहा 08 कोटी रुपयांचा खर्च येईल. – योजनेत जायकवाडी धरणावर उद्भव विहीर व पंपगृह उभारले जातील. – 392 एमएलडी एवढ्या क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र – शहर व सातारा देवळाई क्षेत्रात विविध ठिकाणी 49 उंच तर 4 जमिनीलगत अशा पाण्याच्या 53 टाक्या उभारल्या जातील. – अशुद्ध पाण्यासाठी जवळपास 40 किमी लांबीची पाण्याची जलवाहिनी टाकली जाईल. – 84 किलोमीटरची पाणी वाहून नेणारी जलवाहिनी यात टाकली जाईल. तसेच 1,911 किमी लांबीची वितरण व्यवस्था असेल. – सुमारे 90 हजार घरगुती नळजोडण्या योजनेअंतर्गत दिल्या जातील.

इतर बातम्या-

औरंगाबाद खंडपीठाच्या अतिरिक्त बिल्डिंगचा उद्घाटनापूर्वीच वाद, वकील संघाची नाराजी, बहिष्काराचे संकेत

पुरुषांना बांधून ठेवले अन् चौघांची वासना जागृत झाली, तोंडोळी दरोड्याची आपबिती, औरंगाबाद पोलिसांसमोर नवे आव्हान!

Follow Us
धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही...
Jantar Mantar Students Protest | दिल्लीतील आंदोलनास्थळवरून अपडेट्स : धर्मेंद्र प्रधानांच्या घराकडे जाणारा रस्ता बंद! 16 मेट्रो स्थानकेही बंद
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश...

नीट पेपरफुटीत सरकारचे मोठे पाऊल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा, थेट मोठे आदेश..

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर...

Gold Rate Today: सोन्याने पुन्हा घेतली भरारी ! किती महागलं सोनं-चांदी ? आज 1 तोळा सोन्याचे दर..

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त.

मुलांची डोकी फुटताना बघून आनंदाच्या उकळ्या फुटत असतील तर..; समीर चौघुलेंकडून तीव्र संताप व्यक्त

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक.

जंतरमंतरवरच यावं लागेल… त्यांच्या घरी जाऊन वेळ वाया घालवणार नाही; आशुतोष रांका आक्रमक

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना.

पोलीस आंदोलकांना वॅन मध्ये भरुन घेऊन जात होते, पण एकाने गेट उघडला आणि..व्हिडिओ तुफान व्हायरल, चेंबूरमधील घटना

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित.

IND vs ZIM: पराभवाची मालिका मोडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, एक नाही तर तब्बल पाच बदल करावे लागलतील तरच विजय निश्चित