AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…त्यांचा पायच शिल्लक ठेवणार नाही, भाजपने अडवण्याची भाषा करू नये, अंबादास दानवे यांचा इशारा

राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजप आक्रमक झाली आहे. या मुद्द्यावर अंबादास दानवे यांनी मोठं वक्तव्य केलंय.

...त्यांचा पायच शिल्लक ठेवणार नाही, भाजपने अडवण्याची भाषा करू नये, अंबादास दानवे यांचा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 15, 2023 | 1:09 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : भाजपने लक्षात घ्यावं ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी अन् ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी असतात, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी दिलाय. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अडथळा आणणाऱ्या भाजपसाठी हा मोठा इशारा असल्याचं दानवेंनी म्हटलंय. नागपूरमध्ये उद्या महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यातच राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चर्चा सुरु आहेत. राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावरील वक्तव्यावरून माफी मागितली नाही तर महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा भाजपने दिलाय. त्यावरून दानवे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

अंबादास दानवे काय म्हणाले?

कुणी कुणाला येऊ देऊ द्यावं, कुणाला अडवावं , या रिकाम्या गोष्टी भाजपने करू नये. हिंदुस्थानात कुणीही कुठं जाऊ शकतं. राहुल गांधी काश्मीर, श्रीनगरला जाऊन आले. महाराष्ट्र काय पाकिस्तान थोडाय? या देशाच्या भूमीचा एक भाग आहे. याला थांबवण्याची भाषा कुणी करू नये. ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी आहेत. जे म्हणतायत कुणी पाय ठेवू नये… त्यांचा आम्ही पायच शिल्लक ठेवणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिलाय.

मातोश्रीवर राहुल गांधी येणार, स्वागत कसं?

राहुल गांधी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर येणार असल्याची चर्चा आहे. यावरून अंबादास दानवे म्हणाले, ‘ मातोश्रीवर आतापर्यंत सगळे नेते येऊन गेले आहेत. त्यात फार नवीन असं काही नाही. महाविकास आघाडी एकत्रिकरणाची मोठी प्रक्रिया सुरु आहे. त्यात राहुल गांधी आले तर तो एक प्रमुख भाग आहे. त्यामुळे आले तरी आश्चर्य वाटायचं कारण नाही, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय.

बोरनारे यांना धमकीचं पत्र…

वैजापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. यामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय बोरनारे यांनी व्यक्त केलाय. यावरून दानवे म्हणाले, आम्ही अशा प्रकारे धमक्या वगैरे देणार नाहीत, मात्र राजकीय पद्धतीने उत्तर देऊ. बोरनारे यांचा हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करावी.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.