AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी

विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली.

Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी
Image Credit source: AAI website
| Updated on: Mar 18, 2022 | 4:06 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद विमानतळाचा (Aurangabad airport) ताबा आगामी काळात खासगी कंपन्यांच्या हाती सोपवला जाणार आहे. सध्या हे विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. केंद्र सरकारकडून देशातील 17 विमानतळांचे खासगीकरण (Airport privatization) करण्यात येत असून यात औरंगाबादचाही (Aurangabad city) समावेश आहे. विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

देशातील किती विमानतळांचे खासगीकरण?

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चलनीकरण योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आखली. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 13 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येत आहे. यात औरंगाबादसह वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर, तिरुपती, रायपूर, इंदूर, जबलपूर, त्रिची, हुबळी आदी विमानतळांचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

औरंगाबाद विमानतळाची स्थिती काय?

सध्या औरंगाबाद विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असला तरीही येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देणे बाकी आहे. येथे मोठे विमान उतरण्याची सुविधा नाही. येथील धावपट्टीच्या विस्तारीकरणासह एस-बँड डॉपलर वेदर रडार, कार्गो सेवेचा विस्तार व इतर सुविधा बाकी आहेत. खासगीकरण झाल्यास या गोष्टी पूर्ण होतील, सोयी सुविधा मिळाल्यास प्रवासी वाढतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्या-टप्प्याने प्रवासीसेवा पूर्ववत झाली तरीही विमान प्रवाशांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळ हे गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात राहिले आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | लेबर कॉलनीत 20 मार्चनंतर पाडापाडी, दीड कोटींच्या खर्चातून इमारती जमीनदोस्त करणार

Pune crime | पुण्यात रागाने डोकेभणकले अन.. टेलरने ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री ; नेमक काय झालं

... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं
... तर नार्वेकरांना राजीनामा द्यावा लागेल! राऊतांनी स्पष्टच सांगितलं.
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान
देशाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी टिपूने बलिदान दिलं! ओवैसींचं विधान.
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा
माझ्या नादी लागू नका; श्रीकांत शिंदेंचा गणेश नाईकांना इशारा.
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी
पुण्यात भाजप-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा, कार्यकर्ता जखमी.
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका
काँग्रेसची अधोगती मतांच्या राजकारणामुळे; श्रीकांत शिंदेंची टीका.
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!
तेजस ठाकरेंवर रिलायन्स रुग्णालयात उपचार सुरू!.
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक
सपकाळांकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; भाजप आक्रमक.
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका
सपकाळांना महाराष्ट्राचा इतिहास माहित नाही! अतुल सावेंची टीका.
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका
भाजपकडून हिंदू-मुस्लिम रंग देण्याचं काम! हर्षवर्धन सपकाळांकडून टीका.
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक
हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात पुण्यात भाजप- काँग्रेसचे आंदोलक आक्रमक.