AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी

विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली.

Aurangabad Airport खासगीकरणाला वेग, जमिनीचे मोजमाप सुरु, कंपन्यांद्वारे चाचपणी
Image Credit source: AAI website
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 18, 2022 | 4:06 PM
Share

औरंगाबादः औरंगाबाद विमानतळाचा (Aurangabad airport) ताबा आगामी काळात खासगी कंपन्यांच्या हाती सोपवला जाणार आहे. सध्या हे विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात आहे. केंद्र सरकारकडून देशातील 17 विमानतळांचे खासगीकरण (Airport privatization) करण्यात येत असून यात औरंगाबादचाही (Aurangabad city) समावेश आहे. विमानतळ खासगीकरणाला गती मिळत असून निविदा प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या विमानतळाच्या जमिनीचे मोजमाप करण्याची प्रक्रिया सुरू आहे. विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी ही माहिती दिली. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

देशातील किती विमानतळांचे खासगीकरण?

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय चलनीकरण योजनेची घोषणा केली होती. या माध्यमातून तोट्यात असलेल्या सरकारी उपक्रमांच्या मालमत्ता विकून निधी उभारण्याची योजना आखली. त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 13 विमानतळांचे खासगीकरण करण्यात येत आहे. यात औरंगाबादसह वाराणसी, कुशीनगर, गया, अमृतसर, कांग्रा, भुवनेश्वर, तिरुपती, रायपूर, इंदूर, जबलपूर, त्रिची, हुबळी आदी विमानतळांचा समावेश आहे. राष्ट्रीय चलनीकरण योजनेअंतर्गत येत्या चार वर्षांमध्ये देशातील 25 विमानतळांचे खासगीकरण करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.

औरंगाबाद विमानतळाची स्थिती काय?

सध्या औरंगाबाद विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त असला तरीही येथे अनेक सुविधा उपलब्ध करून देणे बाकी आहे. येथे मोठे विमान उतरण्याची सुविधा नाही. येथील धावपट्टीच्या विस्तारीकरणासह एस-बँड डॉपलर वेदर रडार, कार्गो सेवेचा विस्तार व इतर सुविधा बाकी आहेत. खासगीकरण झाल्यास या गोष्टी पूर्ण होतील, सोयी सुविधा मिळाल्यास प्रवासी वाढतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच क्षेत्रांवर परिणाम झाला. अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्या-टप्प्याने प्रवासीसेवा पूर्ववत झाली तरीही विमान प्रवाशांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे औरंगाबाद विमानतळ हे गेल्या तीन वर्षांपासून तोट्यात राहिले आहे.

इतर बातम्या-

Aurangabad | लेबर कॉलनीत 20 मार्चनंतर पाडापाडी, दीड कोटींच्या खर्चातून इमारती जमीनदोस्त करणार

Pune crime | पुण्यात रागाने डोकेभणकले अन.. टेलरने ग्राहकाच्या पोटात खुपसली कात्री ; नेमक काय झालं

Follow Us
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत