AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | पैठणच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ, तब्बल 10 मोबाइलवर डल्ला!

बाजारात गर्दीचा फायदा घेत सातत्याने भुरटे चोर व पाकीटमार यांच्यामुळे  नागरिकांना  अनेकदा फटका बसतो.  शुक्रवारी तब्बल दहा नागरिकांचे मोबाइल चोरी झाल्याने नागरिक संतापले आहेत.

Aurangabad | पैठणच्या आठवडी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ, तब्बल 10 मोबाइलवर डल्ला!
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 07, 2022 | 1:50 PM
Share

औरंगाबादः पैठणच्या आठवडी बाजारात (Paithan Weekly Market) चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी भरलेल्या या बाजारातून नागरिकांचे दहा मोबाइल चोरीला (Theft of mobile) गेल्याने खळबळ उडाली. बाजार करण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या मोबाइलवर अशा प्रकारे डल्ला मारल्यामुळे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. भर दिवसा एकाच वेळी एवढ्या जणांचे मोबाइल चोरीला गेल्यामुळे हे चोर मुरलेले असावेत, असा अंदाज पोलिसांनी (Police) वर्तवला आहे. ग्रामस्थांनी मात्र या प्रकाराचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बाजाराच्या दिवशी पोलीस बंदोबस्त असावा, असी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे.

महिलांची टोळी सक्रिय?

पैठण शहरातील आठवडी बाजारात खरेदीसाठी शहरातील महिला व पुरुषांची मोठी गर्दी होते. बाजारात गर्दीचा फायदा घेत सातत्याने भुरटे चोर व पाकीटमार यांच्यामुळे  नागरिकांना  अनेकदा फटका बसतो.  शुक्रवारी तब्बल दहा नागरिकांचे मोबाइल चोरी झाल्याने नागरिक संतापले आहेत. विशेष म्हणजे दुपारनंतर बाजारातून मोबाइल चोरीला गेले असल्याचे पुढे आले आहे. मोबाइल चोरणारी महिलांची टोळी बाजारात सक्रिय असावी, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

पोलीस बाजारात आले अन्…

दुपारच्या वेळी बाजारातून मोबाइल चोरीला गेल्याची तक्रार देण्यासाठी नागरिक पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. शुक्रवारी नितीन जाधव, अंकुश सोळुंके, मच्छिंद्र मतकर, बाळासाहेब टेकाळे, शशिकांत वीसरे या नागरिकांनी बाजारातून मोबाइल चोरीला गेल्याचा अर्ज केला. त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी एक पथक आठवडी बाजारात रवाना केले. त्यानंतर मात्र एकही मोबाइल चोरीला गेल्याचे समोर आले नाही. म्हणजेच पोलीस येताच चोरट्यांनी बाजारातून पळ काढला असावा.

Follow Us
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
Harshwardhan Sapkal | काँग्रेसमध्ये मोठं बंड? हर्षवर्धन सपकाळ यांच्या हटवणीसाठी थेट दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे निंबाळकर स्पष्टच बोलले...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
Nagpur | शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल; भाजपच्या गळाला लागल्याची चर्चा!
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप नेत्याची जोरदार टीका
रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक
Sakshana Salgar | रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी गोमूत्र शिंपडलं; सक्षणा सलगर आक्रमक, पंढरपुरात पेटला नवा राजकीय वाद!
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; चाकणकरांच्या
मोठी बातमी! राष्ट्रवादीतील रिक्त पदांवर नवीन नियुकत्या; रुपाली चाकणकरांच्या जागी या नावाची चर्चा, राजकारणात मोठं घडणार?
राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
Sanjay Raut UNCUT | ऑपरेशन टायगरच्या चर्चांदरम्यान राऊतांचा मोठा दावा; शिवसेनेचे सर्व 9 खासदार ठाकरेंसोबतच!
ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय
Uddhav Thackeray | Eknath Shinde | ठाकरेंच्या कार्यक्रमाकडे नजर, शिंदेंची तयारी जोरात; 19 जूनला नेमकं काय घडणार?
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?