AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादच्या पाणीप्रश्नासाठी भाजप आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढणार

सिडको-हाडको भागात आठ ते नऊ दिवसाआंड पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी मोठा आक्रोश मोर्चा काढला. एन-7 येथील जलकुंभावर नागरिकांनी हल्लाबोल आंदोलन केलं.

Aurangabad | औरंगाबादच्या पाणीप्रश्नासाठी भाजप आक्रमक, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढणार
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 09, 2022 | 3:43 PM
Share

औरंगाबाद : औरंगाबादचा पाणीप्रश्न (Aurangabad water issue) दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून प्रशासनाला यावर कोणताही ठोस मार्ग काढता येत नाहीये. हाच मुदद्दा घेऊन आता भाजप (BJP) शिवसेनेला धारेवर धरणार असल्याचं चित्र आहे. भाजपचे तगडे नेते देवेंद्र फडवणीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वात औरंगाबादमध्ये पाणी प्रश्नावरून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या मे महिन्यातच या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांसह देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती असेल. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातीलु अनेक राजकीय पक्ष सक्रिय झाले असून नुकतीच मनसेचीही मोठी सभा शहरात झाली. जून महिन्यात शिवसेना नेते उद्धव ठाकरे तसेच एमआयएमचीदेखील सभा होणार आहे. त्यातच आता ज्या पाणीप्रश्नामुळे नागरिक अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत,तोच मुद्दा उचलून धरण्याचं भाजपनं ठरवलं आहे, असं चित्र दिसतंय.

शुक्रवारी भाजपचे मुक्कामी आंदोलन

सिडको-हाडको भागात आठ ते नऊ दिवसाआंड पाणी पुरवठा होत असल्याने संतप्त नागरिकांनी शुक्रवारी मोठा आक्रोश मोर्चा काढला. एन-7 येथील जलकुंभावर नागरिकांनी हल्लाबोल आंदोलन केलं. आमच्या हक्काचं पाणी नियमित आल्याशिवाय आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली. त्यानंतर आंदोलकांना तोंडी आश्वासन देण्यात आले. काही भागात सात, आठ, नऊ दिवसांनी पाणी येते. हे सहा दिवसांनीच येईल, असे आश्वासन देण्यात आले. भाजप आमदार अतुल सावे यांच्या नेतृत्वात हे आंदोल नकरण्यात आले होते. महाविकास आघाडी सरकारमुळे औरंगाबादेत पाणी संकट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला असून लवकरच फडणवीसांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्याची भाजपाची तयारी सुरु आहे.

फडणवीसांचा आरोप काय?

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे औरंगाबादेत पाणी संकट उभे राहिले आहे. 1680 कोटींची योजना मी स्वतः जाहीर केली. मनपाने फक्त एक रुपया द्यावा, बाकीची योजना राज्य सरकार पूर्ण करेल, असे नियोजन होते. नवीन सरकारने हा निर्णय बदलला आणि मनपाने 600 कोटी रुपये द्यावे, असा निर्णय घेतला. पण मनपाकडे एवढे पैसे नाहीत. म्हणून ही योजना मार्गी लागली नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Follow Us
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या हलाचाली, नेमकं काय घडलं?
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या विधानाची चर्चा, नेमकं काय म्हणाले?
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप प्रदेशाध्यक्षांच्या भेटीला; नेमकं काय घडतंय?*
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट म्हणाल्या न्याय देण्यासाठी...
खो-खो, कबड्डी... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
Chhagan Bhujbal | खो-खो, कबड्डी, बुद्धिबळ... राजकारणाचा खेळ करू नका; भुजबळांचा अप्रत्यक्ष निशाणा
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना
बीड पुन्हा हादरलं! पंचायतीच्या कार्यालयाजवळच...समाधान खिंडकरांना बेदम मारहाण
एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ
Pratap Sarnaik | एसटी कर्मचाऱ्यांना मोठी लॉटरी, महागाई भत्त्यात मोठी वाढ; सरकारचा निर्णय काय
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील
कबड्डीचा उत्कृष्ट डाव खेळणारे भुजबळ... पक्षाच्या वर्धापन दिनी सुनील तटकरे भरमंचावरुन हे काय बोलले?
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा
ठाकरे गटाला पुन्हा धक्का? अनेक आमदार-खासदार संपर्कात; शिरसाटांच्या वक्तव्याने ऑपरेशन टायगरची चर्चा!
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा
कृषीमंत्री दत्ता भरणे पुन्हा अडचणीत; कोट्यावधींच्या धान घोटाळ्याचा आरोप झालेल्या मोटवानीसोबतचे फोटोसेशन चर्चेत