AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | तुम्ही विधानसभेत ठराव घ्या, केंद्रात आम्ही लढू, डॉ. कराडांचं शिवसेनेला आव्हान, औरंगाबादेत पुन्हा ‘संभाजीनगर’ चा मुद्दा!

औरंगाबादचं नाव बदलण्यावरून मनसेनंही शिवसेनेला डिवचलं. आज शहरात गुलमंडी परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला डिवचण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली.

Aurangabad | तुम्ही विधानसभेत ठराव घ्या, केंद्रात आम्ही लढू, डॉ. कराडांचं शिवसेनेला आव्हान, औरंगाबादेत पुन्हा 'संभाजीनगर' चा मुद्दा!
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2022 | 4:27 PM
Share

औरंगाबादः शिवसेनेनं विधानसभेत संभाजीनगर (Sambhaji Nagar) नावाचा ठराव घ्यावा आणि केंद्रातून हा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं वक्तव्य करून डॉ. भागवत कराडांनी (Dr. Bhagwat Karad) पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचलंय. औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करण्यावरून भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेकडे (Shiv Sena) चेंडू टोलवला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांचा संभाजीनगर नामांतराचा अजेंडा आहे. मात्र मुस्लिम मतदारांना दुखावून हा निर्णय घेण्याचं धाडस अद्याप एकानेही दाखवलेलं नाही. दरवेळी निवडणुका आल्या की हा मुद्दा उकरून काढला जातो. निवडणुका झाल्या ही मुद्दा गुंडाळून ठेवला जातो. आता पुन्हा महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने भाजपने या मुद्द्यावरून राज्य सरकारमधील शिवसेनेला डिवचलं आहे.

काय म्हणाले डॉ. भागवत कराड?

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि औरंगाबाद भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. भागवत कराड यांनी आज संभाजी महाराज जयंती निमित्त त्यांना अभिवादन केलं. तसंच कोणत्याही स्थितीत या शहराला ‘संभाजीनगर’ शहराला हे नाव मिळालं पाहिजे, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने विधानसभेत हा ठराव घ्यावा आणि तो केंद्राकडे पाठवावा. आम्ही तेथे प्रयत्न करून हा मु्द्दा मार्गी लावू, असं डॉ. कराड म्हणाले.

‘संभाजीनगर’ वरून मनसेची बॅनरबाजी

औरंगाबादचं नाव बदलण्यावरून मनसेनंही शिवसेनेला डिवचलं. आज शहरात गुलमंडी परिसरात मनसेतर्फे शिवसेनेला डिवचण्यासाठी बॅनरबाजी करण्यात आली. तमाम हिंदूंचं स्वप्न मनसे पूर्ण करणार. शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीवर मनसेनं अशी बॅनरबाजी केली आहे. त्यामुळे आता शिवसेना याला कसं प्रत्युत्तर देतेय, हे पहावं लागेल.

‘खासदार इम्तियाज जलील यांना धिक्कार’

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी दोन दिवसांपूर्वी खुलताबादमधील औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घ्यायला गेले होते. यावरून शिवसेना, भाजपतर्फे तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. डॉ. कराड यांनीही खासदार जलील यांचा निषेध केला. ते म्हणाले, ‘ लोकांनी ज्या खासदाराला निवडून दिलं, त्याने औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन दर्शन घेतलं. अशा खासदाराचा मी निषेध करतो. धिक्कार करतो. दोन महिन्यांपूर्वीच आम्ही तिथलं दर्शन घेत नाहीत, असं त्यांनी सांगितलं होतं. यासाठी आमच्या युवा मोर्चातर्फे आंदोलनही करण्यात आलं. हे आंदोलन आम्ही आणखी तीव्र करणार आहोत. ‘

Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...