Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?

मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?
औरंगाबादेत नमाज पठणावेळी खासदार जलील भावूक Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 03, 2022 | 9:56 AM

औरंगाबादः तब्बल दोन वर्षानंतर औरंगाबादच्या ईदगाह (Eidgah Ground) मैदानावर हजारो मुस्लिम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हेदेखील उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुस्लिम भाविकांनी (Muslim Devotees) नमाज पठणास सुरुवात केली. नमाज म्हणजे अल्लाहकडे क्षमा याचना करण्याचा प्रसंग असतो. यावेळी खासदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले. नमाज पठण सुरु असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकिकडे नमाज पठण सुरु होते तर इकडे खासदार जलील डोळ्यांतील अश्रू पूसत होते. त्यामुळे इम्तियाज जलील एवढे भावूक का झाले, असाच प्रश्न सर्वांच्या मनात आला. मात्र नमाज पठण झाल्यानंतर स्वतःच्या भावना आवरत खासदार जलील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना अश्रू येण्याचं कारण सांगितलं.

का भावूक झाले खासदार जलील?

नमाज पठण झाल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, खासदार जलील म्हणाले, मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे आपण अनेक प्रियजनांना गमावलं आहे. दोनच महिन्यांपूर्वी मी माझ्या आईला गमावलं. आईशिवाय ही पहिली ईद आहे. त्यामुळे नमाज पठण करताना आठवणींचा बांध फुटला..’

‘देशात शांतता, बंधूप्रेम रहाण्यासाठी प्रार्थना’

ईदनिमित्त देशभरातील मुस्लिम भाविकांना शुभेच्छा देताना खासदार जलील म्हणाले, ‘ दोन वर्षात अनेक नातेवाईक, मित्र गमावले. देशातील स्थिती पाहता, शांतता, बंधूप्रेम राखण्याची गरज आहे. आज देशातील मशिदींवर संकट आलं आहे. नमाज पठणापासून रोखलं जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वांनी दुआ मागितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशात शांतता व बंधुप्रेम राहण्यासाठी आम्ही प्रार्थना केली. मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केली आहे.’

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.