AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?

मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केल्याचं खासदार जलील यांनी सांगितलं.

Aurangabad | नमाज पठण करताना Imtiaz Jaleel भावूक, औरंगाबादच्या ईदगाह मैदानावर काय घडलं?
औरंगाबादेत नमाज पठणावेळी खासदार जलील भावूक Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 9:56 AM
Share

औरंगाबादः तब्बल दोन वर्षानंतर औरंगाबादच्या ईदगाह (Eidgah Ground) मैदानावर हजारो मुस्लिम भाविक नमाज अदा करण्यासाठी जमा झाले. यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jaleel) हेदेखील उपस्थित होते. सकाळी सव्वा नऊ वाजेच्या सुमारास मुस्लिम भाविकांनी (Muslim Devotees) नमाज पठणास सुरुवात केली. नमाज म्हणजे अल्लाहकडे क्षमा याचना करण्याचा प्रसंग असतो. यावेळी खासदार इम्तियाज जलील अत्यंत भावूक झाले. नमाज पठण सुरु असतानाच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. एकिकडे नमाज पठण सुरु होते तर इकडे खासदार जलील डोळ्यांतील अश्रू पूसत होते. त्यामुळे इम्तियाज जलील एवढे भावूक का झाले, असाच प्रश्न सर्वांच्या मनात आला. मात्र नमाज पठण झाल्यानंतर स्वतःच्या भावना आवरत खासदार जलील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देताना अश्रू येण्याचं कारण सांगितलं.

का भावूक झाले खासदार जलील?

नमाज पठण झाल्यावर माध्यमांना प्रतिक्रिया देताना, खासदार जलील म्हणाले, मागील दोन वर्षात कोरोना संकटामुळे आपण अनेक प्रियजनांना गमावलं आहे. दोनच महिन्यांपूर्वी मी माझ्या आईला गमावलं. आईशिवाय ही पहिली ईद आहे. त्यामुळे नमाज पठण करताना आठवणींचा बांध फुटला..’

‘देशात शांतता, बंधूप्रेम रहाण्यासाठी प्रार्थना’

ईदनिमित्त देशभरातील मुस्लिम भाविकांना शुभेच्छा देताना खासदार जलील म्हणाले, ‘ दोन वर्षात अनेक नातेवाईक, मित्र गमावले. देशातील स्थिती पाहता, शांतता, बंधूप्रेम राखण्याची गरज आहे. आज देशातील मशिदींवर संकट आलं आहे. नमाज पठणापासून रोखलं जात आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी आम्ही सर्वांनी दुआ मागितली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, देशात शांतता व बंधुप्रेम राहण्यासाठी आम्ही प्रार्थना केली. मोहम्मद पैगंरांनी मानवतेची शिकवण दिली आहे. त्यामुळे इथे फक्त मुस्लिम नव्हे तर देशातील सर्व धर्माच्या लोकांच्या शांततेसाठी आम्ही प्रार्थना केली आहे.’

Follow Us
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?
राष्ट्रवादीच्या चिरफळ्या उडणार... लवकरच महाभूकंप, ते 22 आमदार कोण?.