AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंजेबाच्या कबरीजवळ काही काळ तणाव, पर्यटकांना येऊ देऊ नये- स्थानिकांची मागणी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

काही हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर उखडूनच का टाकू नये, असा प्रश्न विचारला. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Aurangabad | औरंजेबाच्या कबरीजवळ काही काळ तणाव, पर्यटकांना येऊ देऊ नये- स्थानिकांची मागणी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 17, 2022 | 4:52 PM
Share

औरंगाबादः औरंगाबादमधील वादग्रस्त ठरलेली औरंगजेबाची कबर (Aurangzeb Tomb) पर्यटकांसाठी (Tourist) बंदच करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. खुलताबाद येथील नागरिकांनी आज अचानकपणे कबरीला पाहण्यासाठी पर्यटकांनी येऊच नये, अशी मागणी केली.  पर्यटकांनाही कबर परिसरात येऊ दिलं नाही. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत नागरिकांना शांत केलं. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी औरंगजेबच्या कबरीचं दर्शन घेतल्यानंतर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ही मशीद उखडून टाकण्याचीही भाषा करण्यात आली. राज्य सरकारकडे तशी मागणीही करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची अज्ञातांकडून मोडतोड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना या मशिदीत येण्यास परवानगीच न देण्याचा आग्रह स्थानिक करत आहेत.

पर्यटकांची अडवणूक

12 मे रोजी एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन ओवैसी आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावरून शहरातील शिवसेना नेते तसेच भाजपकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. छत्रपती संभाजी राजेंची हत्या करणाऱ्या, तसेच स्वतःच्या भावालाही जीवानीशी मारणाऱ्या, जनतेचा क्रूर छळ करणाऱ्या औरंगजेब बादशहाच्या समोर कुणी नतमस्तक होऊच कसं शकतं? असा सवाल विचारला गेला. महाराष्ट्रात राहून ही हिंमत करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. डॉ. भागवत यांनी तर औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच काही हिंदुत्ववादी संघटनांनी ही कबर उखडूनच का टाकू नये, असा प्रश्न विचारला. या सर्व पार्श्वभूमीवर औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

खुलताबाद इथं आहे औरंगाबादची कबर

मुघलांचा शेवटचा बादशहा औरंगजेब याचा मृत्यू 3 मार्च 1707 साली नगर येथे झाला. त्याचा मुलगा आझम शाह आणि मुलगी झीनत ऊन निस्सा यांनी त्याचा दफन विधी खुलताबाद येथे केले. हे ठिकाण औरंगाबादपासून 20 ते 22 किलोमीटर लांब आहे. आपला दफनविधी खुलताबादमधील शेख झैन उद दिन (औरंगजेबाचा आध्यात्मिक गुरू) यांच्या दर्ग्याजवळ करावी, अशी औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा होती. त्यामुळे त्याचा दफनविधी खुलताबादमध्ये करण्यात आला.

Follow Us
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
महाराष्ट्र आधी राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
महाराष्ट्र आधी… राजकारण नंतर! NEETवरून अमित ठाकरेंनी सरकारला थेट सुनवलं
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला निर्णय
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबाऱ्यावर नाव नाही?; सरकारने घेतला मोठा निर्णय, व्हिडिओ बघाच
शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sanjay Raut | शिवसेना 5 हजार कोटींना विकली! संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बस्तर सफरीत काळाचा घाला! मुंबईच्या 24 वर्षीय बायकरचा दुर्दैवी अंत; नेमकं काय घडलं?
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?