AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!
औरंगाबाद महापालिकेला 250 कोटींचे कर्ज मिळाले. Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Mar 18, 2022 | 1:37 PM
Share

औरंगाबादः शहरवासियांसाठी आणि एकूणच शहरात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेचे (Aurangabad municipal corporation) 250 रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पांसाठी महापालिका जो वाटा भरणार होती, त्यासाठीचा निधी महापालिकेकडे येईल. महापालिकेचा स्मार्ट सिटीसाठीचा 182 कोटी रुपयांचा वाटा शिल्लक होता. आता लवकरच तो भरला जाईल. तसेच स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरीत कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटीत कुणा-कुणाचा हिस्सा?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत एकूण एक हजार कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्र शासनाचे 500 कोटी तर राज्य सरकार आणि महापालिकेचा वाटा प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा आहे. त्यानुसार, केंद्र शासनाने आतापर्यंत 294 कोटी रुपये दिले आहेत. तर राज्य शासनाने 147 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर महापालिकेला 250 कोटी रुपयांचा हिस्सा भरायचा होता. महापालिकेने फक्त 68 कोटी रुपये भरले होते. उर्वरीत 182 कोटींचा हिस्सा भरणे बाकी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून 309 कोटी रुपयांचा हिस्सा आणखी मिळणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील आठवड्यात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर 250 कोटी रुपयांचे कर्ज बुधवारी मंजूर झाले. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे आता 491 कोटी रुपयांचा निधी राहणार आहे.

कर्ज मंजूर, पुढे काय?

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या निधीचा हिस्सा मिळेल. त्यानंतर स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्युकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचे पुढील बांधकाम अशी कामे प्रस्तावित आहेत.

इतर बातम्या-

Nashik | रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण, नाशिकमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.