AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

Aurangabad | चला महापालिकेला 250 कोटींचे Loan मिळाले, आता Smart city च्या कामांना आणखी वेग येणार!
औरंगाबाद महापालिकेला 250 कोटींचे कर्ज मिळाले. Image Credit source: TV9 Marathi
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 18, 2022 | 1:37 PM
Share

औरंगाबादः शहरवासियांसाठी आणि एकूणच शहरात सुरु असलेल्या विकास प्रकल्पांसाठी महत्त्वाची बातमी आहे. औरंगाबाद महापालिकेचे (Aurangabad municipal corporation) 250 रुपयांचे कर्ज सेंट्रल बँक ऑफ इंडियाने मंजूर केले आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी (Smart city) प्रकल्पांसाठी महापालिका जो वाटा भरणार होती, त्यासाठीचा निधी महापालिकेकडे येईल. महापालिकेचा स्मार्ट सिटीसाठीचा 182 कोटी रुपयांचा वाटा शिल्लक होता. आता लवकरच तो भरला जाईल. तसेच स्मार्ट सिटीतून प्रस्तावित उर्वरीत कामे आता मार्गी लागतील, असे प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांनी सांगितले. महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे.

स्मार्ट सिटीत कुणा-कुणाचा हिस्सा?

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत एकूण एक हजार कोटी रुपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यात केंद्र शासनाचे 500 कोटी तर राज्य सरकार आणि महापालिकेचा वाटा प्रत्येकी 250 कोटी रुपयांचा आहे. त्यानुसार, केंद्र शासनाने आतापर्यंत 294 कोटी रुपये दिले आहेत. तर राज्य शासनाने 147 कोटी रुपये दिले आहेत. यानंतर महापालिकेला 250 कोटी रुपयांचा हिस्सा भरायचा होता. महापालिकेने फक्त 68 कोटी रुपये भरले होते. उर्वरीत 182 कोटींचा हिस्सा भरणे बाकी आहे. केंद्र व राज्य सरकारकडून 309 कोटी रुपयांचा हिस्सा आणखी मिळणार आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता एवढी मोठी रक्कम भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महापालिकेच्या वतीने कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मागील आठवड्यात राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने महापालिकेला 250 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंजुरी दिली होती. त्यानंतर 250 कोटी रुपयांचे कर्ज बुधवारी मंजूर झाले. त्यामुळे स्मार्ट सिटीकडे आता 491 कोटी रुपयांचा निधी राहणार आहे.

कर्ज मंजूर, पुढे काय?

महापालिका आता कर्ज मिळाल्यानंतर स्मार्ट सिटीचे 182 कोटी रुपये भरणार आहे. कर्ज मंजूर झाल्याने आता स्मार्ट सिटीची उर्वरीत कामे मार्गी लागतील, असा विश्वास प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी व्यक्त केला आहे. केंद्र व राज्य शासनाकडून त्यांच्या निधीचा हिस्सा मिळेल. त्यानंतर स्मार्ट हेल्थ, स्मार्ट एज्युकेशन, संत तुकाराम सिडको नाट्यगृहाचे नूतनीकरण, सफारी पार्कचे पुढील बांधकाम अशी कामे प्रस्तावित आहेत.

इतर बातम्या-

Nashik | रुग्णालयात घुसून डॉक्टरच्या मुलाला बेदम मारहाण, नाशिकमधील घटना सीसीटीव्हीत कैद

Nashik | सटाणा न्यायालयाला नवीन इमारत मिळणार; 10 कोटी 37 लाखांचा निधी मंजूर, काय असतील सोयी-सुविधा?

Follow Us
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार....
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....