AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा

औरंगाबादः शहरातील घरा-घरांतील कचरा नियमितपणे उचलला जावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा जबाबदार असते. औरंगाबादमधील (Aurangabad city) कचरा संकलनासाठी (Garbage Collection) महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या (Smart city) वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या […]

Aurangabad | महापालिकेची घंटागाडी वेळेवर येत नाही? औरंगाबादकरांनो, कॉल करा आणि 5 तासात समस्या दूर करा
औरंगाबाद महापालिकेच्या वतीने घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जाते. Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 17, 2022 | 6:00 AM
Share

औरंगाबादः शहरातील घरा-घरांतील कचरा नियमितपणे उचलला जावा, यासाठी महापालिकेची यंत्रणा जबाबदार असते. औरंगाबादमधील (Aurangabad city) कचरा संकलनासाठी (Garbage Collection) महापालिकेने खासगी एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र शहरातील अनेक भागांमधील नागरिकांची, घंटागाडी नियमितपणे येत नाही, कचरा दिवसेंदिवस तसाच पडून राहतो, अशा तक्रारी असतात. स्मार्ट सिटीच्या (Smart city) वॉर रुममध्ये मागील पंधरा दिवसात अशा बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. मात्र ज्या भागात घंटागाडी नियमितपणे येत नाही, त्या नागरिकांनी पुढे येत महापालिकेकडे थेट तक्रार करावी, असे आवाहन स्मार्ट सिटीच्या वॉर रुमच्या वतीने सांगण्यात आले आहे.

कचरा संकलनासाठी महापालिकेची व्यवस्था काय?

शहरातील कचरा संकलनाच्या कामाचे खासगीकरण करण्यात आले आहे. महापालिकेने हे काम बंगळुरू येथील पी गोपीनाथ रेड्डी कंपनीला दिले आहे. सध्या याच कंपनीकडून घरोघरी जाऊन घंटागाडीच्या माध्यमातून कचरा संकलन होते. हे काम अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी तक्रार निवारण केंद्राची स्थापना केली आहे. या ठिकाणी कचऱ्यासंबंधीच्या तक्रारी दाखल करून घेतल्या जात आहेत. स्मार्ट सिटीच्या मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये 1मार्चपासून आतापर्यंत नागरिकांनी 60 तक्रारी केल्या आहेत. यात घंटागाडी वेळेवर येत नाही, घंटागाडी आलीच नाही, कचरा पडून आहे, अशा स्वरुपाच्या तक्रारींचा समावेश आहे.

कुठे करणार तक्रार?

एखाद्या भागात कचरा पडून असेल किंवा घंटागाडी वेळेवर येत नसेल तर नागरिकांना वॉर रुमकडे तक्रार करता येते. ही तक्रार 8055505002 किंवा 8055128080 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून किंवा व्हॉट्सअपवर तसेच फेसबुक, इन्स्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

पाच तासात तक्रार निवारण

स्मार्ट सिटीच्या वॉर रुममध्ये तक्रार दाखल झाल्यावर ती तक्रार रेड्डी कंपनीकडे वर्ग केली जाते. या तक्रारीच्या निवारणासाठी कंपनीला जास्तीत जास्त पाच तासांची मुदत देण्यात आली आहे. या वेळेतच तक्रारीचे निवारण करून संबंधित तक्रारदारास त्याबाबतची माहिती कळवणी कंपनीला बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे घंटागाडीविषयी तक्रार असलेल्या नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर बातम्या-

फेसबुक, ट्विटर सारख्या सोशल मीडियाच्या दुरुपयोगामुळे लोकशाहीला धोका, सोनिया गांधींचा संसदेत हल्लाबोल

शरीरातील ‘या’ घटकाच्या कमतरतेने होतात हे पाच आजार…

Follow Us
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ,
'मी अजूनही जिवंत आहे'; सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून भावनिक व्हिडीओ, म्हणाले आजच उपोषण...