AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादेत ‘एम्स’ उभारण्याच्या घोषणेचं काय झालं? राष्ट्रवादीच्या आमदारांकडून केंद्रीय मंत्र्यांना आठवणीचे पत्र

औरंगाबाद शहरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था त्वरीत सुरू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

Aurangabad | औरंगाबादेत 'एम्स' उभारण्याच्या घोषणेचं काय झालं? राष्ट्रवादीच्या आमदारांकडून केंद्रीय मंत्र्यांना आठवणीचे पत्र
आमदार सतीश चव्हाण यांचे डॉ. भागवत कराड यांना निवेदनImage Credit source: ट्विटर
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 30, 2022 | 11:38 AM
Share

औरंगाबाद | औरंगाबाद शहरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) (AIIMS) ही संस्था सुरु करणे हे माझे ध्येय असेल, अशी घोषणा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी केली होती. त्या घोषणेचं काय झालं, अशी आठवण राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण (Satish Chavan) यांनी करून दिली आहे. औरंगाबादमध्ये उपचार घेण्यासाठी केवळ मराठवाड्यातून नव्हे तर अकोला, बुलडाणा आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांतूनदेखील रुग्ण येतात. मात्र या सर्व गरजू रुग्णांचा ताण घाटी रुग्णालयावर पडतो. त्यामुळे शहरात एम्स ही संस्था सुरू करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांच्याकडे केली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी डॉ.भागवत कराड यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने दरभंगा (बिहार), अवनीपुरा (जम्मू-काश्मीर), मनेठी (हरियाणा) या राज्यात नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. औरंगाबाद (महाराष्ट्र) शहरात देखील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था सुरू व्हावी अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. आपण स्वत: यासाठी पुढाकार घेणार होतात. मात्र या मागणीचा कुठेही विचार करण्यात आला नसल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी डॉ.भागवत कराड यांच्या निवेदनाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे.

घाटी रुग्णालयावरील ताण कमी होईल

‘एज्युकेशन हब’ म्हणून औरंगाबादची ओळख होऊ लागली आहे. ‘एम्स’ सारखी राष्ट्रीय पातळीवरील संस्था जर औरंगाबादेत सुरू झाली तर येथील शैक्षणिक वातावरणाला आणखी बळकटी मिळेल, असं आमदार चव्हाण यांनी सांगितलं. औरंगाबाद शहरात असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयात (घाटी) मराठवाड्यासह विदर्भ तसेच खानदेशातील विविध जिल्ह्यातील रूग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे घाटीवर मोठा ताण येतो. त्यामुळे ‘एम्स’ संस्था याठिकाणी सुरू झाली तर घाटीवर येणारा रूग्णांचा अतिरिक्त ताण कमी होईल. शिवाय वैद्यकीय पदवी व पदवीव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जागा देखील वाढतील. त्याच बरोबर मराठवाड्यातील गोर गरीब रूग्णांना विविध अत्याधुनिक उपचार या माध्यमातून मिळण्यास मदत होईल असे आमदार सतीश चव्हाण यांनी निवेदनात नमूद केले आहे.

सप्टेंबर 2021 मध्ये डॉ. कराड यांची घोषणा

आमदार सतीश चव्हाण यांनी या निवेदनात म्हटले आहे की, ‘ आपल्या रूपाने मराठवाड्याला पहिल्यांदाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पद मिळाले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएएम) औरंगाबाद शाखेच्यावतीने सप्टेंबर 2021 रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल आपला सत्कार करण्यात आला होता. याप्रसंगी आपण औरंगाबादेत ‘एम्स’ ही संस्था सुरू करणे हेच माझे ध्येय असल्याचे सांगितले होते. आपण स्वत: डॉक्टर असल्याने मराठवाड्यातील नागरिकांना आपल्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे औरंगाबाद शहरात ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) ही संस्था त्वरीत सुरू व्हावी यासाठी आपण पुढाकार घ्यावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.

इतर बातम्या-

Who is Umran Malik: उमरान मलिक… ज्याची वादळी गोलंदाजी पाहून रवी शास्त्रींपासून इरफान पठाणपर्यंत सगळे झाले फॅन

VIDEO: विदर्भात nanar refinery project नेण्यासाठी काँग्रेस नेता मला भेटला: संजय राऊत

Follow Us
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात
TMC च्या 58 आमदारानंतर आता तब्बल 18 खासदार थेट... बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ!
तटकरेंचा तट तोडून आले! भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
Chhagan Bhujbal | तटकरेंचा तट तोडून आले! राज्यसभा अर्जावेळी भुजबळांची गोगावलेंवर मिश्किल टिप्पणी
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं
धक्कादायक! मुलीचा साखरपुडा अवघ्या पाच दिवसांवर असताना आईचं हादरवणारं कृत्य, थेट स्टेटस  ठेवला अन्... पुढे काय घडलं?
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
मुंबई हादरली! BEST बसचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, तर 3 जण गंभीर जखमी
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी...
महाबळेश्वर बस स्थानकात वाहतूक निरीक्षकाची प्रवाशांसह पत्रकारांशी अरेरावी, थेट अर्वाच्च भाषेत... व्हिडीओ व्हायरल
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे..
अचानक बोलवली INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक, कारण सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच..
Bhandara | क्षणात होत्याचं नव्हतं झालं! बोट उलटल्याने दोन जणांचा मृत्यू, तर पाच जण....
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
पेपर लीक रोखण्यासाठी NTAचं मोठं पाऊल, परीक्षा होईपर्यंत पेपर सेटर्स...
छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
Supriya Sule | छगन भुजबळ दिल्लीत गेले असते तर...; सुप्रिया सुळेंच्या विधानाची जोरदार चर्चा
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत...
मला राज्यसभेवर जायचंय पण आता... छगन भुजबळ अखेर बोललेच, राष्ट्रवादीत मोठी खलबत