Aurangabad | कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांचे पद धोक्यात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय घडतंय?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (Jayashri Suryawanshi) यांचे कुलसचिव पद धोक्यात आले आहे.

Aurangabad | कुलसचिव जयश्री सूर्यवंशी यांचे पद धोक्यात? डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात काय घडतंय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:44 AM

औरंगाबादः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या (Dr.Babasaheb Ambedkar Marathwada University) कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी (Jayashri Suryawanshi) यांचे कुलसचिव पद धोक्यात आले आहे. जयश्री यांच्या महाविद्यालयातील प्रथम नियुक्तीवर उच्चस्तरीय चौकशी समितीने आक्षेप घेतला आहे. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले (Dr. Pramod Yewle) यांना दोन दिवसात अभिप्राय कळवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या उपसचिवांचे यासंदर्भातील पत्र विद्यापीठाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे डॉ. जयश्री यांचे पदावर टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे. रिपब्लिकन कार्यकर्ता नागराज गायकवाड यांनी इं.भा. पाठक महाविद्यालयातील डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्या प्रथम नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

काय आहे नेमका आक्षेप?

रिपब्लिकन कार्यकर्ता नागराज यांनी घेतलेल्या आक्षेपानुसार, डॉ. जयश्री सूर्यवंशी या खुल्या प्रवर्गातील आहेत. मात्र महाविद्यालयात अधिव्याख्याताच्या प्रथम नियुक्तीसाठी त्यांनी विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गातील राखीव जागेचा फायदा घेतला. त्यामुळे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी त्यांची महाविद्यालयीन सेवा ग्राह्य धरण्यात येऊ नये, असा आक्षेप शपथपत्राद्वारे नागराज गायकवाड यांनी उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना सादर केला आहे. मंत्री सामंत यांच्या आदेशानुसा, याप्रकरणी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय नियुक्त केली. या समितीने चौकशी केल्यानंतर उच्चशिक्षण मंत्रालयाकडे चौकशी अहवाल सादर करण्यात आला.

चौकशीतून काय समोर आले?

शासनाने 17 फेब्रुवारी रोजी संचालक डॉ. धनराज माने यांना एका पत्राद्वारे सूचना केली की, डॉ. सूर्यवंशी यांची सदर महाविद्यालयातील नियुक्ती जाहिरातीतील विहित आरक्षण डावलून, विहित अर्हता पूर्ण होत नसतानाही तात्पुरत्या स्वरुपात केली गेली. यासंदर्भात कारवाईकरिता कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांचा मोबाइल बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही, अशी माहिती हाती आली आहे.

कुलगुरूंना दोन दिवसात अभिप्राय द्यावा लागणार

सदर महाविद्यालयातील प्राचार्यांना डॉ. जयश्री यांच्या नियुक्तीबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच 21 फेब्रुवारी रोजी कुलगुरुंनाही यासंदर्भातील अभिप्राय देण्याबाबत कळवण्यात आले होते. त्यानंतर आता 11 मार्च रोजी पुन्हा स्मरणपत्र पाठवून कुलगुरुंकडून आता दोन दिवसात अभिप्राय मागवण्यात आला आहे.

इतर बातम्या-

पोलिस उपनिरीक्षक वाशिमला, अमरावतीत पत्नीची आत्महत्या, आईचा मृतदेह पाहून लेकरांचा टाहो

Nashik | नाव मोठे लक्षण खोटे; सुप्रसिद्ध मेकअप क्लासच्या संचालकाचा महिलेवर बलात्कार

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.