AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबाद जिल्हा परिषद निडणुकीचा बिगुल वाजला, गटांची संख्या आता 70, येत्या 27 जूनला अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार

जिल्हा परिषदेप्रमाणेच काल औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

Aurangabad | औरंगाबाद जिल्हा परिषद निडणुकीचा बिगुल वाजला, गटांची संख्या आता 70, येत्या 27 जूनला अंतिम आराखडा प्रसिद्ध होणार
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 03, 2022 | 1:43 PM
Share

औरंगाबादः आगामी निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या (Aurangabad ZP) गट आणि गणांचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे. गुरुवारी तो प्रसिद्ध करण्यात आला. यानुसार जिल्हा परिषदेतील गटांची संख्याही आता 62 वरून 70 वर पोहोचली आहे. तसेच जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad) गणांची संख्या आता 140 झाली आहे. यात सिल्लोड (Sillod) तालुक्यातील गटांची संख्या दोनने वाढली आहे. तर खुलताबाद आणि सोयगाव या तालुक्यात एकही गट वाढलेला नाही. इतर तालुक्यात एक-एक अशी गटांची संख्या वाढली असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 23 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे हा आराखडा सादर केला. 31 मे पर्यंत विभागीय आयुक्तांनी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली होती. त्यानंतर 02 जून रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. 08 जूनपर्यंत या आराखड्यावर हरकती आणि सूचना मांडण्याची मुदत असेल.

08 जून पर्यंत हरकतींसाठीची मुदत

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या मुदतीप्रमाणे 31 मे रोजी या प्रारुप आराखड्याला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मान्यता दिली आहे. या आराखड्यावर 02 जूनपासून हरकती व सूचना मागवण्यात येत आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हरकती द्याव्या लागणार आहेत. 08 जूनपर्यंत हरकती व आक्षेप नोंदवता येतील. 22 जूनपर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांनर सुनावणी देऊन विभागीय आयुक्तांकडून गण रचना अंतिम करण्यात येईल. त्यानंतर 27 जून रोजी अंतिम प्रभाग रचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या प्रभाग रचनेवर राजकीय पक्षांचे आक्षेप

दरम्यान जिल्हा परिषदेप्रमाणेच काल औरंगाबाद महापालिकेच्या प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. यावर विविध राजकीय पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. अनेक वसत्या आणि कॉलन्यांचे नव्या वॉर्ड रचनेत तुकडे करण्यात आल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आपण नेमक्या कोणत्या वॉर्डात येतोय, यावरून नागरिकांचाही गोंधळ उडालेला दिसतोय. काही राजकीय पक्षांच्या दबावाखाली अशी रचना केल्याचा आरोपही केला जातोय. विविध पक्षांचे नेते प्रभाग रचनेवर आक्षेप नोंदवणार आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.