AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईवरचं लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महागाईवरचं लक्ष वळवण्यासाठी अमरावती भडकवली, शिवसेना नेते संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
संजय राऊत यांची औरंगाबादमध्ये केंद्र सरकारमधील भाजपवर टीका
| Edited By: | Updated on: Nov 13, 2021 | 2:27 PM
Share

औरंगाबादः शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नेतृत्वात आज 13 ऑक्टोबर रोजी औरंगाबादमध्ये (Aurangabad Strike) महागाईविरोधात मोर्चा काढण्यात आला. महागाईविरोधात देशभरात आंदोलन करणार असून त्याची ठिणगी औरंगाबादमध्ये पडली आहे, असं वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी मोर्चातील भाषणात बोलताना केलं. तसंच देशातील प्रमुख प्रश्नांवरून जनतेचं लक्ष वळवण्यासाठी भाजपने अमरावतीत आग भडकवण्याचे काम सुरू केल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. अमरावतीत काल झालेल्या हिंसाचारातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आज भाजपचे कार्यकर्ते आणि भला मोठा जमाव रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे शहरात दोन गटांतील तणावामुळे हिंसाचाराच्या घटना घडत आहे. यामुळे अमरावतीत दंगलसदृश्य परिस्थिती असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

महागाई म्हटलं की हिंदू-मुसलमान विषय निघतात- राऊत

महागाईविरोधातल्या आंदोलनात बोलताना संजय राऊत म्हणाले, महागाईविरोधातील लक्ष वळवण्यासाठी भाजप विविध फालतू मुद्द्यांना हात घालतं. महागाईचा प्रश्न विचारला तर भारत-पाकिस्तान, चीनची घुसखोरी, हिंदू-मुसलमान असे प्रश्न पेटवले जातात. या प्रश्नांशी सामान्य जनतेचा काहीही संबंध नाही. पण जनतेला या मुद्द्यात अडकवून ठेवलं जातं, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील- राऊतांचा इशारा

महाराष्ट्रात दंगली पेटवण्याचं काम करणाऱ्यांना संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले, आम्हाला व्यवस्थितपणे राज्य करू न देण्याचं हे कारस्थान विरोधी पक्षानं चालनलं आहे. केंद्र सरकार त्यांना पाठिशी घालत आहे. पण एक लक्षात ठेवा, आम्हाला हात लावाल तर तुमचे हात जळतील, असं संजय राऊत म्हणाले. भगवा हातात घेऊन शिवसेना पुढे जात आहे, हे त्यांना देखवत नाही, म्हणून भाजप ही कारस्थानं करतंय, पण आम्ही तुमच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाऊन दाखवू. उद्धव ठाकरे राज्यातच नाही तर राष्ट्रीय राजकारणातही प्रगती करतील, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपला दिला.

इतर बातम्या

Special Report: मुंबईतील दंगल, कार्टुनिस्टच्या मृत्यूचं सेलिब्रेशन ते भिवंडी-नांदेडमधील आंदोलन; रझा अकादमीचे 5 मोठे वाद

औरंगाबादेत शिवसेनेच्या आक्रोश मोर्चाला सुरुवात, संजय राऊतांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आंदोलन

Follow Us
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया
माझी चूक असेल तर...; व्हीएसआरच्या मालकांची मोठी प्रतिक्रिया.
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान
ठाकरेंसारख्या नेत्याने विधानपरिषदेत असणं हे...; राऊतांचं मोठं विधान.
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका
भारत अमेरिकेचा गुलाम बनत आहे! संजय राऊतांची परखड टीका.
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका
बजेटमध्ये कर्जमाफीचे केवळ सोंग! विजय वडेट्टीवार यांची टीका.
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता
मुंबईला उष्णतेच्या लाटेचा इशारा! तापमान ४२ अंशांवर पोहोचण्याची शक्यता.
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात
नाथषष्ठी सोहळा: पैठणमध्ये संत एकनाथ महाराजांच्या उत्सवाला सुरुवात.
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?
बच्चू कडूंचा सरकारला दुपारी ४ वाजेपर्यंतचा अल्टिमेटम; काय घडलं?.
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!
प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजारात मोठी घसरण!.
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन
भारत तिसऱ्यांदा टी-20 विश्वचषक विजेता! पंतप्रधानांनी केलं अभिनंदन.