ठाणे: त्रिपुरातील घटनेचे राज्यातही पडसाद उमटले आहेत. रझा अकादमीने काल भिवंडीत बंद पुकारला होता. तर नांदेडमध्ये रॅली काढण्यात आली होती. रझा अकादमीने नांदेडमध्ये काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागले. त्यामुळे पुन्हा एकदा रझा अकादमी चर्चेच आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात हिंसक आंदोलन ते नांदेड-भिवंडीतील आंदोलनात प्रमुख भूमिका असलेली रझा अकादमी नेमकी काय आहे? त्याचा घेतलेला हा आढावा.