AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिल्ह्यातील 6 लाख नागरिक दोन्ही डोसचे लसवंत, कवच कुंडल मोहिमेत विशेष केंद्रांद्वारे लसीकरणाला यश

  औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात […]

जिल्ह्यातील  6 लाख नागरिक दोन्ही डोसचे लसवंत, कवच कुंडल मोहिमेत विशेष केंद्रांद्वारे लसीकरणाला यश
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 17, 2021 | 6:23 PM
Share

औरंगाबाद: कोरोनाचा प्रादुर्भाव बऱ्यापैकी आटोक्यात आल्याची चिन्हे पाहून लसीकरणाचा वेग आणखी वाढवल्यास तिसऱ्या लाटेपूर्वी नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढीस लागू शकते. या उद्देशाने देशभरातील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. 08 ते 14 ऑक्टोबरपर्यंत राज्य सरकारने राबवलेल्या कवचकुंडल मोहिमेअंतर्गत औरंगाबादमध्येही विशेष केंद्र स्थापन करून लसीकरण करण्यात आले. 14 ऑक्टोबर 2021 पर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 6 लाख नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतल्याची आकडेवारी जिल्हा प्रशासकांकडून कळवण्यात आली आहे.

लसीकरणाबाबत जनजागृतीही

गेल्या दीड वर्षापासून जगभरात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेने थैमान घातले. या काळात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झापाट्याने वाढून अनेकांचा जीव गमवावा लागला. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. लोकांनी लस टोचून घ्यावी, यासाठीदेखील लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. जिल्ह्यात विविध ठिकाणी कँप लावण्यात आले.

टार्गेट किती, साध्य किती?

औरंगाबाद शहरासाठी 10 लाख 55 हजार 654 नागरिकांना लस (Corona vaccination) देण्याचे टार्गेट होते. तसेच ग्रामीण भागातील 21 लाख 69 हजार 23 लोकांना लस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. अशा प्रकारे औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad district) एकूण 32 लाख 24 हजार 677 नागरिकांना लसवंत करण्याचे टार्गेट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत यातील ग्रामीण भागात 10 लाख 33 हजार 691 तर शहरी भागात 6 लाख 5 हजार, 663 असे एकूण 16 लाख 39 हजार 354 जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर ग्रामीण भागात 3 लाख 1 हजार 448 व शहरी भागातील 3 लाख 37 हजार 173 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजेच दोन डोस घेणाऱ्यांची एकूण संख्या 6 लाख 38 हजार 621 अशी आहे. नियोजित टार्गेटनुसार पहिला डोस घेतलेल्यांची टक्केवारी 50.84 आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी 19.80 एवढी आहे.

शनिवारी 9 कोरोनाबाधित

दरम्यान, जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे 9 नवे बाधित रुग्ण सापडले. यात मनपाच्या हद्दीत 5 तर ग्रामीण भागात 4 रुग्ण आढळून आले. सध्या जिल्ह्यात 152 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

इतर बातम्या-

औरंगाबाद: व्यावसायिक मीटरची किंमत 1 लाख रुपये? लवकरच अवैध कनेक्शनची तपासणी होणार

चांगल्या कामासाठी औरंगाबाद महापालिकेत योग्य उमेदवार निवडून द्या, डॉ. भागवत कराड यांचे औरंगाबादेत आवाहन 

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.