AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!

यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Aurangabad: संभाजीनगर नावाला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध, दोन्ही शहराध्यक्षांनी स्पष्ट केली भूमिका!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगर नामकरणाचा मुद्दा पेटला
| Edited By: | Updated on: Dec 06, 2021 | 1:30 PM
Share

औरंगाबादः महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar) नामकरण करण्याच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली जात आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री संभाजीनगर या नावावर भर देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीने शहराचे नाव औरंगाबादच राहील, अशी भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचा अनेक वर्षांपासूनचा अजेंडा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शहराचे नाव संभाजीनगर ठेवले, तेव्हापासून शिवसेना औरंगाबादचे नाव घेताना संभाजीनगर असाच उल्लेख करते. दरवेळी महापालिका निवडणुकीच्या वेळी हा मुद्दा तापवला जातो. विशेष म्हणजे यंदा महाविकास आघाडी असूनही शिवसेनेचे मंत्री, लोकप्रतिनिझीही संभाजीनगर असा उल्लेख करतात. शहराचे नाव संभाजीनगर झाले पाहिजे, यासाठी ते आग्रहाची भूमिका घेतात. या वादात आता काँग्रेस-राष्ट्रवादीनेही उडी घेतली असून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

सर्वसाधारण सभेतील ठरावाने कल्याण काळे अडचणीत

काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीने शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव एकमताने मंजूर करून शासनाला पाठवला. या ठरावानंतर औरंगाबाद शहर व जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. या ठरावामुळे जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे अडचणीत आले असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन या वादावर म्हणाले, ”शहराचे नाव कुणीही काहीही घेतल्याने काही फरक पडत नाही. आमच्या नेत्यांनी या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण प्रलंबित आहे. कुणी कितीही प्रयत्न केले तरी औरंगाबाद हेच नाव राहील.” तर काँग्रेसचे शहराध्यक्ष  मोहम्मद हिशाम उस्मानी म्हणाले, ”इतिहास बदलण्याचा प्रयत्न कुणीही करून नये, औरंगाबादचे नव्हे तर राज्य व देशातील कोणत्याही शहराचे नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध आहे. मित्रपक्ष असो वा कुणीही अशी मागणी केली तरी आम्ही त्याला विरोधच करणार.” शहरातील एका वृत्तपत्राला या दोन्ही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली.

इतर बातम्या-

Chaityabhoomi | दर्शन रांगेवरुन चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटात वाद, काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात

मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.