AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! औरंगाबाद की संभाजीनगर वादात नवा ट्विस्ट, उद्योजकांनो, भूमिका घ्या, खा. इम्तियाज जलील यांचं थेट आवाहन!

Aurangabad Name change | औरंगाबाद की संभाजीनगर यापैकी एक भूमिका उद्योजकांनी स्पष्ट करावी, असं आवाहन खा. जलील यांनी केलंय.

मोठी बातमी ! औरंगाबाद की संभाजीनगर वादात नवा ट्विस्ट, उद्योजकांनो, भूमिका घ्या, खा. इम्तियाज जलील यांचं थेट आवाहन!
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Mar 11, 2023 | 4:54 PM
Share

दत्ता कनवटे, छत्रपती संभाजीनगर | राज्य आणि केंद्र सरकारने औरंगाबाद (Aurangabad) शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) करण्यास मंजुरी दिली आहे. शहरातील बहुतांश ठिकाणी आता छत्रपती संभाजीनगर नाव वापरण्यास सुरुवात देखील झाली आहे. मात्र नामांतर विरोधी संघटनांनी अजूनही प्रयत्न सोडलेले नाही. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह नामांतर विरोधी संघटनांचं आंदोलन सुरुच आहे. शहरात वेगवेगळ्या मार्गांनी निदर्शनं आंदोलनं सुरु आहेत. खा. जलील यांच्या नेतृत्वात दोन दिवसांपूर्वी शहरातून मोठा कँडल मार्च काढण्यात आला. नामांतरविरोधी आणि नामांतराच्या समर्थनार्थ संघटनांच्या परस्पर विरोधात्मक भूमिकांमुळे शहराच्या सामाजिक सलोख्याला बाधा पोहोचू शकते, अशी भूमिका शहरातील उद्योजकांनी घेतली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही पाठवलंय. मात्र खा. इम्तियाज जलील यांनी आता उद्योजकांनाच या वादात खेचलंय.

उद्योजकांनी भूमिका ठरवावी

खा. जलील म्हणाले, आम्ही लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहेत. ज्या उद्योजकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलंय, मी त्यांनाच विचारतो. त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. उद्योग जगातील व्यक्तींनी त्यांना औरंगाबाद हवंय की संभाजीनगर नाव हवंय, ही भूमिका स्पष्ट करावी. कोणतीही भूमिका न घेणं हे चालणार नाही. आपल्या शहराला औद्योगिक नगरीचा दर्जा आहे. आपण अनेक देशात औरंगाबादकर म्हणून गेलो. त्यामुळे तुमचं काहीतरी मत असेल. तुम्हाला छत्रपती संभाजीनगर नाव हवं असेल तर ते तरी स्पष्ट सांगा, असं आवाहन खा. जलील यांनी केलंय.

उद्योजकांचं काय पत्र?

छत्रपती संभाजीनगर शहरातील उद्योजक, व्यापाऱ्यांच्या संघटनेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलंय. शहरातील नामांतर विरोधी आणि नामांतराच्या समर्थनार्थ होणाऱ्या घडामोडींमुळे सामाजित सलोखा बिघडू शकतो. शहरात अशांततेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. याचा थेट परिणाम सामान्य नागरिक, व्यापारी वर्गाला बसू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच दोन्ही भूमिकांच्या संघटनांना एकत्र बसवून सोयीस्कर मार्ग काढावा, अशी मागणी या पत्रातून केली आहे.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?