AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई, पुण्यानंतर आता औरंगाबादमधील महिला पोलिसांचीही 8 तास ड्युटी, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचा निर्णय!

महिला पोलिसांना दैनंदिन काम, गंभीर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात अनेक वेळा ज्यादा तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर परिणाम होतात, असे दिसून आल्याने सर्वप्रथम नागपूर पोलीस आयुक्तालयात आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यानंतर हा निर्णय राज्य सरकारने सर्वत्र लागू केला.

मुंबई, पुण्यानंतर आता औरंगाबादमधील महिला पोलिसांचीही 8 तास ड्युटी, औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाचा निर्णय!
प्रातिनिधिक छायाचित्र
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 22, 2021 | 7:00 AM
Share

औरंगाबादः मुंबई, पुणे, नागपूर पाठोपाठ आता औरंगाबादमधील महिला पोलिसांच्या कामाचे तासही कमी करण्यात आले आहेत. महिला पोलिसांना आता आठ तासांचीच ड्युटी करावी लागेल. कौटुंबिक आणि कार्यालयीन जबाबदाऱ्यांचा मेळ बसवण्यासाठी राज्यातील महिला पोलिसांच्या ड्युटीचे तास 8 तासच करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या होत्या. यापूर्वी त्यांना 12 तासांची ड्युटी करणे अनिवार्य होते. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने यासंबंधीचे आदेश काढले होते. त्याची अंमलबजावणी औरंगाबादेत तीन महिने उशीराने होत आहे. 21 डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी औरंगबादेत होईल, असे आदेश नुकतेच पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी कराढले.

कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताळमेळ बसण्यासाठी निर्णय

महिला पोलिसांना दैनंदिन काम, गंभीर गुन्ह्यांच्या तपासासंदर्भात अनेक वेळा ज्यादा तास काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्यांवर परिणाम होतात, असे दिसून आल्याने सर्वप्रथम नागपूर पोलीस आयुक्तालयात आयुक्त अमितेशकुमार यांनी यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्यांनी मगिला पोलिसांना आठ तासांच्या ड्युटीचा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू केला होता. राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी इतर घटकांनीही हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर 25 सप्टेंबर रोजी तर राज्यात सर्वत्र हा नियम लागू करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले. तरीही औरंगाबादेत तीन महिने विलंबाने याची अंमलबजावणी होत आहे.

महिला अधिकाऱ्यांना मात्र नियम लागू नाही

महिला पोलीसांच्या कामाच्या तापात कपात करण्यात आली असली तरीही महिला पोलीस अधिकाऱ्यांना मात्र पूर्वीच्याच वेळेत काम करावे लागणार आहे. याबाबत महिला पोलीस अधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उलट अधिकाऱ्यांवर कामाचा जास्त ताण असतो. त्यामुळे त्यांच्याही बाबतीत असा निर्णय घेतला जावा, असा सूर उमटत आहे.

अपवादात्मक स्थितीत अतिरिक्त काम करणे अनिवार्य

दरम्यान, आठ तासांची ड्युटी हा नियम लागू असला तरीही अपवादात्मक स्थितीत, पोलीस बंदोबस्ताची तातडीची गरज निर्माण झाल्यास महिला पोलिसांनाही आठ तासांच्या वर अतिरिक्त वेळ देऊन काम करावे लागेल, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत.

इतर बातम्या-

Priyanka Gandhi: माझ्या मुलांचं Instagram हॅक केलं जातंय, सरकारकडे काही कामधंदा नाहीये का?; प्रियंका गांधी भडकल्या

नागपुरातील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी! पटोले, राऊत, केदार यांना दिल्लीचं बोलावणं

Follow Us
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी...
राज साहेबांनी गोविंदा पथकांना... मनसे नेते अविनाश जाधवांचं दहीहंडी उत्सवाबाबत मोठं विधान
कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात
Vijay Wadettiwar | कुटुंबावर राजकीय सूड उगवणं चुकीचं! विजय वड्डेटीवारांचा सरकारवर घणाघात; उद्धव ठाकरेंच्या मुलाला लक्ष्य केल्याचा आरोप