मराठवाडा: अतिवृष्टीमुळे 14 दिवसात 34 जणांचा मृत्यू, धरणांतून विसर्ग सुरूच, अनेक गावांशी संपर्क तुटला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 27, 2021 | 12:48 PM

दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. एक ते 14 सप्टेंबर या कालावधीत 34 जणांचा जीव गेला. तसेच लहान-मोठ्या अशा 414 दुधाळ जनावरांचा तसेच 3430 कोंबड्या आणि मोठ्या 18 जनावरांचा मृत्यू झाला.

मराठवाडा: अतिवृष्टीमुळे 14 दिवसात 34 जणांचा मृत्यू, धरणांतून विसर्ग सुरूच, अनेक गावांशी संपर्क तुटला

औरंगाबाद: बदललेल्या हवामानामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा मुक्काम वाढला आहे. परभणी, नांदेड, बीडमध्ये (Parbhani, Nanded, Beed) पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्णपणे भरले असून त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परभणी, हिंगोली, बीड, नांदेडमधील महत्त्वाची धरणे भरली असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. मात्र गुलाब चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील दोन दिवस मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange alert for some districts in Marathwada) जारी करण्यात आल्याने पूरस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

परभणीः येलदरी धरणातून किती विसर्ग?

जिल्ह्यातील येलदरी धरण आणि निम्न दुधना प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने रविवारी सायंकाळी धरणांचे गेट उघडण्यात आले. यातून 17 हजार 328 क्युसेक वेगाने विसर्ग करण्यात आला. तसेच या भागातील पिंपळदर, चारठाणा मंडळात रविवारी अतिवृष्टी झाली.

माजलगाव व मांजरा धरणाची काय स्थिती?

धुँवाधार पावसामुळे रविवारी माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे सिंदफणा नदीपात्रात 62 हजार 517 क्युसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. मांजरा धरणातही पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे सहा दरवाजे उघडून 35 हजार 968 क्युसेक वेगाने मांजरा नदीत विसर्ग करण्यात आला.

नांदेडः विष्णुपुरी धरणाचे ६ दरवाजे उघडले

मुसळधार पावसामुळे विष्णुपुरी धरणाचेही 6 दरवाजे रविवारी उघडण्यात येऊन नदीपात्रात पाण्यासा विसर्ग सुरु करण्यात आला. सततच्या पावसामुळे छत्रपती चौक ते निळ्या फाट्याची दयनीय अवस्था झाली.

अतिवृष्टीमुळे 14 दिवसांत 34 जणांचा मृत्यू

दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. एक ते 14 सप्टेंबर या कालावधीत 34 जणांचा जीव गेला. तसेच लहान-मोठ्या अशा 414 दुधाळ जनावरांचा तसेच 3430 कोंबड्या आणि मोठ्या 18 जनावरांचा मृत्यू झाला. सगळ्यात जास्त मनुष्यहानी नांदेड जिल्ह्यात झाली. अतिवृष्टीत मृत झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये आर्थिक मदत देण्यात आल्याची माहिती, उस्मानाबादचे निवासी जिल्हाधिकारी, शिवकुमार स्वामी यांनी दिली. (Heavy rains flooded dams in Marathwada, cut off communication with many villages, Aurangabad, Maharashtra)

इतर बातम्या- 

Mumbai Rain : मुंबईत 23 तारखेपर्यंत पावसाचा जोर, मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज

Solapur Rain | सोलापुरात बोरी आणि हरणा नदीला पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला 

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI