Mumbai Rain : मुंबईत 23 तारखेपर्यंत पावसाचा जोर, मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई आणि उपनगरात 23 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.

Mumbai Rain : मुंबईत 23 तारखेपर्यंत पावसाचा जोर, मुसळधार पावसाची शक्यता, सखल भागात पाणी साचण्याचा अंदाज
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 20, 2021 | 4:20 PM

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. मुंबई आणि उपनगरात 23 सप्टेंबर पर्यंत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबईत काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. पश्चिम किनारपट्टीवर मान्सून सक्रिय असल्यानं मुंबईत मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचणार असल्याचा अंदाज स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे. सांताक्रुझमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला असून काल रात्रीपासून परिसरात 71 मिमी पाऊस झाल्याचं स्कायमेटचे महेश पलवत यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम

महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम असल्याचं स्कायमेटचे महेश पुलावत यांनी सांगितलं आहे. त्यामुळे 23 सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भातही पावसाचा जोर वाढला असून धरणांतील पाणी साठ्यात वाढ झाली असून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत लोअर परेल भागात जोरदार पाऊस

मुंबईत काल रात्रीपासून जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईत गेल्या 24 तासात साधारणपणे 71 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती आहे. तर, रात्री सांताक्रुझमध्ये तर सकाळी लोअर परेल बागात दमदार पाऊस झाला आहे.

गोंदियात दमदार पाऊस

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळ पासून पाऊस सूर असल्याने देवरी आमगाव रोड वरील डवकी गावाजवळील पुलावरून अर्धाफुट पाणी वाहत आहे. हा पूल तात्पुरता स्वरूपात येण्याजाण्यासाठी तयार करण्यात आला असून सुद्धा नागरिक मात्र जीव धोक्यात घालून प्रवास करत आहेत. या पुलावरून राष्ट्रीय महामार्गावर जाणारी आणि राष्ट्रीय महामार्गावरून आमगाव आणि गोंदिया कडे येणारी जड वाहतूक, खाजगी वाहने आणि नागरिकांचे येणे जाणे सुरू आहे. आणि कधीही या पुलावरुन पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढू शकतो त्यामुळेच एखादी मोठी दुर्घटना होऊ शकते हे नाकारता येत नाही.

चंद्रपूर शहर जिल्ह्यात पावसाला सुरुवात

चंद्रपूर आज सकाळपासून आकाश ढगाळलेले होते. काल श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीतही पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा बॅकलॉग आहे. अद्याप जलाशये-धरणे यात अल्प पाणीसाठा असून पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. गेल्या अर्ध्या तासापासून पडत असलेल्या कमी अधिक मुसळधार पावसाने जलाशयात पाणीसाठा वृद्धी होण्याची शक्यता आहे. पावसाळा संपत आला असताना जिल्ह्यातील पावसाची वार्षिक सरासरी 85 टक्के आहे.

इतर बातम्या:

नागपूरसह विदर्भाच्या काही भागात 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा, पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता!

Best Shopping Places : मुंबईला फिरायला जाण्याचा विचार करताय; स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध 5 ठिकाणांना नक्की भेट द्या

Mumbai Weather Forecast skymet predicts heavy rainfall at various places of mumbai during next three days

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.