AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव

लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव
मविआने खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या जागा मागासवर्गीय उमेदवारांना विकल्या
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 10, 2021 | 12:37 PM
Share

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad corporation election ) राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election commission ) सूचनांनुसार औरंगाबाद महानगरपालिकेने प्रशासकीय स्तरावर 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात 9 हजार 746 लोकसंख्येचा एक वॉर्ड राहणार आहे. एकूण 126 वॉर्डांपैकी 63 वॉर्ड महिलांसाठी (Reservation for women) राखीव राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आयोगाचे शपथपत्र सादर

औरंगाबादमधील महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. परंतु निवडणूक प्रक्रिया जैसे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. हे आदेश उठवण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले असल्याची माहिती उपायक्त संतोष टेंगळे यांनी दिली आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत कच्चा आराखडा सादर करण्याची मुदत

राज्य निवडणूक आयोगाने 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. प्रभागांची संख्या 42 असेल. निवडणुकीसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला जाईल. 26 हजार 315 ते 32 हजार 161 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. तर एका वॉर्डाची लोकसंख्या 9,746 असेल. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी होती. मात्र या मतदारांची संख्या 9 लाख 39 हजार 458 एवढी आहे. मात्र यंदा मतदारांच्या संख्येत 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लोकसंख्येच्या तुलनेत 60 ते 70 टक्के मतदार असतील.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक