AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव

लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील.

औरंगाबाद मनपा निवडणूक: 126 पैकी 63 वॉर्ड महिला नगरसेवकांसाठी राखीव
मविआने खुल्या प्रवर्गातील महिलांच्या आरक्षणाच्या जागा मागासवर्गीय उमेदवारांना विकल्या
| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 12:37 PM
Share

औरंगाबादः आगामी महापालिका निवडणुकीसाठी (Aurangabad corporation election ) राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election commission ) सूचनांनुसार औरंगाबाद महानगरपालिकेने प्रशासकीय स्तरावर 42 प्रभागांचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. शहरात 9 हजार 746 लोकसंख्येचा एक वॉर्ड राहणार आहे. एकूण 126 वॉर्डांपैकी 63 वॉर्ड महिलांसाठी (Reservation for women) राखीव राहणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयात आयोगाचे शपथपत्र सादर

औरंगाबादमधील महानगरपालिकेच्या वॉर्ड रचनेवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेली आहे. त्यावर अद्याप सुनावणी झालेली नाही. परंतु निवडणूक प्रक्रिया जैसे ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. हे आदेश उठवण्यासाठी आता राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर केले असल्याची माहिती उपायक्त संतोष टेंगळे यांनी दिली आहे.

18 नोव्हेंबरपर्यंत कच्चा आराखडा सादर करण्याची मुदत

राज्य निवडणूक आयोगाने 18 नोव्हेंबरपर्यंत प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा करण्याचे आदेश दिले आहेत. लोकसंख्या वाढीमुळे नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 2011 ची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 होती. त्याआधारे नगरसेवकांची संख्या 115 वरून 126 करण्यात आली आहे. यापैकी निम्मे वॉर्ड महिलांसाठी राखीव असतील. प्रभागांची संख्या 42 असेल. निवडणुकीसाठी तीन वॉर्डांचा एक प्रभाग केला जाईल. 26 हजार 315 ते 32 हजार 161 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. तर एका वॉर्डाची लोकसंख्या 9,746 असेल. 2011 च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या 12 लाख 28 हजार 32 एवढी होती. मात्र या मतदारांची संख्या 9 लाख 39 हजार 458 एवढी आहे. मात्र यंदा मतदारांच्या संख्येत 10 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डात लोकसंख्येच्या तुलनेत 60 ते 70 टक्के मतदार असतील.

इतर बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच, मराठवाड्यात 120 जणांचे निलंबन, नादेंडमध्ये सर्वाधिक 58 जणांवर कारवाई

तुला पैसे प्रिय का प्रेयसी? त्याच्या ओठांना लावला विषाचा प्याला, भर दिवाळीत प्रियकर बेशुद्ध, काय घडलं जालन्यात?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.