AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार

01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार
30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 07, 2021 | 9:28 AM
Share

औरंगाबादः राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना (New Voters Registration) नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी केंद्राकडे धाव घ्यावी लागणार आहे.

09 वॉर्डात नोंदणी सहाय्यता कक्ष

महापालिकेच्या क्षेत्रातील 9 वॉर्डांमध्ये मतदार यादीतील दुरुस्त्यांकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी केंद्र स्तरीय अधिकारी, पालिकेचे 315 कर्मचारी हे दुबारनोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी व त्रुटी असलेली नावे दुरुस्त करतील. 13, 14,15 नोव्हेंबर तसेच 27,28 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी नोंदणी करावी

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी नव मतदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच 01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

नोंदणीसाठी कुठे आहेत सुविधा?

महापालिकेतील मतदाराला मतदार नोंदणी सुलक्ष करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात, ग्राहक सेवा केंद्रात नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार कार्यालयात ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे.

दोन वर्षात वाढले 50 हजार मतदार

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 28 लाख 99 हजार 110 मतदार असून यात 15 लाख 29 हजार 461 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर 13 लाख 69 हजार 699 हजार 619 मतदार महिला आहेत. तसेच 30 इतर मतदारांचाही समावेश आहे. मागील दोन वर्षात 50 हजार मतदार वाढले आहेत. इतर बातम्या-

औरंगाबादेत जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध, नोव्हेंबर अखेरपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होणार

लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज.

49 वर्षांपूर्वी आलेल्या या गाण्याची आजही तूफान क्रेझ, अवघ्या 9 वर्षांच्या मुलीने दिला होता आवाज