AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार

01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

Aurangabad: मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू, महापालिकेचे 09 कक्ष 30 नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार
30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
| Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Nov 07, 2021 | 9:28 AM
Share

औरंगाबादः राज्य निवडणूक आयोगाने (state election commission) 1 जानेवारी 2022 या अर्हता तारखेवर मतदार नोंदणी कार्यक्रम जाहीर केला आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या नवीन मतदारांना (New Voters Registration) नोंदणी करता यावी, यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादमधील मतदारांच्या जुन्या यादीतील नावे, फोटोतील दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. यादीत नाव नसणारे आणि नवीन मतदार यांना 30 नोव्हेंबरपर्यंत मतदार नोंदणी केंद्राकडे धाव घ्यावी लागणार आहे.

09 वॉर्डात नोंदणी सहाय्यता कक्ष

महापालिकेच्या क्षेत्रातील 9 वॉर्डांमध्ये मतदार यादीतील दुरुस्त्यांकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मतदार यादीतील त्रुटी दुरुस्तीसाठी केंद्र स्तरीय अधिकारी, पालिकेचे 315 कर्मचारी हे दुबारनोंदी, एकापेक्षा अधिक नोंदी व त्रुटी असलेली नावे दुरुस्त करतील. 13, 14,15 नोव्हेंबर तसेच 27,28 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर नोंदणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्षे पूर्ण करणाऱ्यांनी नोंदणी करावी

आगामी महापालिकेच्या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी नव मतदारांनी पुढाकार घ्यावा. तसेच 01 जानेवारी 2022 रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र मतदारांनी नोंदणी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी आणि महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचे कर्तव्य बजवावे, असे आवाहान जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

नोंदणीसाठी कुठे आहेत सुविधा?

महापालिकेतील मतदाराला मतदार नोंदणी सुलक्ष करण्यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा वापर करता येईल. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रात, ग्राहक सेवा केंद्रात नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच सर्व मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक नोंदणी अधिकारी, तथा तहसीलदार कार्यालयात ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे.

दोन वर्षात वाढले 50 हजार मतदार

औरंगाबाद जिल्ह्यात एकूण 28 लाख 99 हजार 110 मतदार असून यात 15 लाख 29 हजार 461 पुरुष मतदारांचा समावेश आहे. तर 13 लाख 69 हजार 699 हजार 619 मतदार महिला आहेत. तसेच 30 इतर मतदारांचाही समावेश आहे. मागील दोन वर्षात 50 हजार मतदार वाढले आहेत. इतर बातम्या-

औरंगाबादेत जिल्हा परिषद निवडणुकांचे वेध, नोव्हेंबर अखेरपर्यंत आरक्षण सोडत जाहीर होणार

लखलखत्या सोन्याचा कस, कसोटी ते कॅरोटोमीटर, सोने परीक्षणाच्या पद्धती सांगणारा Special Report!

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक