AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा

कोकणातील शेतकऱ्यांसाठी रासपने ब्लू प्रिंट बनवली आहे. कोकणातील पाणी पाईपलाईनद्वारे मराठवाड्याला आणलं पाहिजे. गायीच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळाला पाहिजे. (mahadev jankar)

महादेव जानकर म्हणतात, मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करतो!, पण अट काय?; वाचा
Mahadev Jankar
| Edited By: | Updated on: Aug 09, 2021 | 3:37 PM
Share

औरंगाबाद: राष्ट्रीय समाज पार्टी हा फुले, शाहू आणि आंबेडकरांना मानणारा पक्ष आहे. आमची लढाई ही हिंदुत्ववाद्यांसोबत आहे, असं सांगतानाच रासपचे 50 आमदार निवडून आल्यास मराठवाड्याचा कॅलिफोर्निया करू, अशी घोषणा रासपचे अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली. (mahadev jankar addresses media at aurangabad)

महादेव जानकर यानी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आम्ही औरंगाबाद महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यासाठी आम्ही पक्ष संघटना वाढवण्यावर भर देणार आहोत. औरंगाबाद महापालिकेच्या सर्व प्रभागात रासपचे उमेदवार उभे करण्यात येणार आहेत, असं जानकर म्हणाले. रासप पक्ष वाढत आहे. रासप राष्ट्रीय पक्ष व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

200 विधानसभेत रॅली काढणार

कोकणातील शेतकऱ्यांसाठी रासपने ब्लू प्रिंट बनवली आहे. कोकणातील पाणी पाईपलाईनद्वारे मराठवाड्याला आणलं पाहिजे. गायीच्या दुधाला 50 रुपये आणि म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळाला पाहिजे. पण काही झारीतले शुक्राचार्य हे होऊ देत नाही, असं त्यांनी सांगितलं. 100 गाड्या घेऊन रासप राज्यातील 200 विधानसभांमध्ये रॅली काढणार आहे. या देशात जनावरांची जनगणना होते, पण माणासांची होत नाही. काँग्रेसची सत्ता असताना मंडल आयोग लागू का झाला नाही? असा सवाल करतानाच ओबीसींची जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी ओबीसींना न्याय द्यावा

एमपीएससीच्या बोर्डात ओबीसीचा एकही संचालक नाही. त्यामुळे ओबीसींनी जागं झालं पाहिजे. कुठपर्यंत भीग मागणार आहात? जो बंगला माझा नाही तिथे काय राहायचं हे ओबीसींनीच ठरवलं पाहिजे. ओबीसींसाठी हक्काची झोपडी बांधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: लक्ष देऊन ओबीसींना न्याय दिला पाहिजे, असं आवाहनही त्यांनी केलं. (mahadev jankar addresses media at aurangabad)

संबंधित बातम्या:

आघाडी सरकारला आरक्षण द्यायचंच नाहीये, त्यामुळेच वेळकाढूपणा सुरू आहे; फडणवीसांचा दिल्लीतून हल्लाबोल

मुख्यमंत्र्यांनी लोकलचा सोपा प्रश्न अवघड केला, परवानगी देताना नवे अडथळे निर्माण केल्याचा भाजपचा आरोप

2014 पासून देशाला ग्रहण लागलं, लोकशाहीच्या चारही स्तंभाचे स्वातंत्र्य धोक्यात; नाना पटोलेंचा केंद्रावर हल्ला

(mahadev jankar addresses media at aurangabad)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.