AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची मागणी

ईदच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. (mim mp imtiaz jaleel ramadan)

रमजानच्या शेवटच्या आठवड्यात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची मागणी
imtiaz jaleel
| Updated on: May 04, 2021 | 3:40 PM
Share

औरंगाबाद : रमजानच्या (Ramadan) शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेऊन त्यांनी ही मागणी केली. सध्या मुस्लीम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना सुरु आहे. मुस्लीम समाजामध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. याच कारणामुळे जलील यांनी ही मागणी केली. (MIM MP Imtiaz Jaleel demand give permission to open shop on occasion last week of Ramadan)

नियम अटींसह दुकाने उघडी करायला परवानगी द्यावी

येत्या काही दिवसांत रमजानच्या शेवटच्या आठवड्यास सुरुवात होईल. त्यामुळे यावेळी मुस्लीम बांधवांना वेगवेगळी खरेदी करायची असते. मात्र, सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्य सरकारने अनेक निर्बंध लागू केलेले आहे. औरंगाबादसह इतर ठिकाणची दुकाने बंद आहेत. त्यामुळे मुस्लीम बांधवांस सामान खरेदी करण्यास अडचण निर्माण होऊ शकते. ती होऊ नये म्हणून ईदच्या शेवटच्या आठवड्यात दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी घेऊन औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांची भेट घेतली. या काळात नियम आणि अटी घालून दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिलील यांनी केली.

मुस्लीम बांधवांसाठी पवित्र महिना

मुस्लिम धर्मामध्ये रमजानचा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात मुस्लिम बांधव उपवास अर्थात रोजे ठेवतात. रमजान हा इस्लामी कॅलेंडरचा नववा महिना आहे. रमजानच्या 29-30 दिवसांदरम्यान सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाण्याचा एक थेंबही न घेता अत्यंत कडक रोजा पाळला जातो. या काळात नमाजालासुद्धा मोठं महत्व असल्याने पुढील तीस दिवस विशेष नमाजचे पठन केले जाते. या वर्षी रमजानचा महिना 12 एप्रिल 2021 (बुधवार) पासून सुरु झाला असून येत्या 13 मेला तो संपणार आहे. त्यामुळे या रमजानच्या शेवटच्या आठवड्यात बाजारपेठेतील दुकाने सुरु करावीत, अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

रमजानचं महत्त्व काय?

मुहम्मद पैगंबर रमजानबाबत म्हणतात की या महिन्यात स्वर्गाची दारं खुली असतात आणि नरकाची दारं बंद असतात. अर्थात, इस्लामच्या माध्यमातून जीवनातील कर्तव्यपूर्ती करता येते. स्वत:ला अल्लाहपुढे समर्पित करुन त्याने दिलेल्या आदेशानुसार जगण्याचा मुस्लिम बांधव प्रयत्न करतात. मुसलमान म्हणून असणारी सर्व धार्मिक कर्तव्य पार पाडतात.

दरम्यान, जलील यांच्या या मागणीनंतर पोलीस आयुक्तांनी त्याबाबत प्रतिक्रिया दिली नसून आगामी काळात बाजारपेठा उघडण्याच्या मागणीवर काय निर्णय होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

इतर बातम्या :

Ramadan 2021 | रमजानची तारीख, सेहरी आणि इफ्तारीची वेळ, जाणून घ्या रमजानचं महत्त्व…

Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.