AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“कालीचरणसारखे लोक चोरलफंग्यासारखे असतात”; त्या वक्तव्यावरून या नेत्याची सडकून टीका

दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कालीचरणसारखे लोक हे चोर लफंगेसारखे असतात.

कालीचरणसारखे लोक चोरलफंग्यासारखे असतात; त्या वक्तव्यावरून या नेत्याची सडकून टीका
| Updated on: Apr 01, 2023 | 5:23 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात तुफान राडा झाला होता. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून संभाजीनगरमध्ये वातावरण तणावपूर्ण होते. दगडफेक झाल्याने काही जण या राड्यात गंभीर जखमीही झाले आहे. तर दुसरीकडे कालच्या राड्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. संभाजीनगरमध्ये वाद चिघळल्यानंतर 20 वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. त्यामुळे आता या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. तर दुसरीकडे आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या राड्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या वादावरून कालीचरण महाराज यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळेही आता या वादाला आता नवे वळण लागण्याची शक्यता लागली आहे.

समाजात होणाऱ्या ज्या दंगली आहेत. त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा गंभीर आरोप कालीचरण यांच्याकडून केला गेला आहे. त्यावरून इम्तियाज जलील यांनीही त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या प्रकरणावरून टीका करताना त्यांनी या राड्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र ही चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मगाणीही खासदार जलील यांनी केली आहे.

छत्रपती संभाजी नगरात दंगल झाली त्या दिवशी अनेक नेते दारू पिऊन घरात झोपले होते अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यामुळे आता जलील यांच्या टीकेनंतर राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे.

समाजात होणाऱ्या ज्या दंगली घडतात, त्या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात आहेत असा गंभीर वक्तव्य कालीचरण यांच्याकडून करण्यात आले आहे.

कोल्हापूरात बोलताना त्यांनी समाजात घडणाऱ्या या दंगली मुसलमानांकडूनच घडवल्या जात असल्याची टीका त्यांनी केली होती. त्यावर बोलताना इम्तियाज जलील यांनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, कालीचरणसारखे लोक हे चोर लफंगेसारखे असतात.

त्यांच्यावर बोलण्यात काहीही अर्थ नाही असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या प्रकारची काही वादग्रस्त वक्तव्य करणारी लोकं काही दिवसानंतर हे सगळे लोक जेलमध्ये असतील असंही त्यांनी यावेळी सांगितले.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.